विकास राज्यकर्त्यांच्या घरात लपून बसलाय

सध्याच्या काळात काही मंडळी भौतिक सुखे मिळतात, भरपूर पैसा मिळतो म्हणून राजकारणात येतात. राजकारणात आल्यावर आपल्याला झटपट श्रीमंत होता येतंच पण काही सन्मानाची पदेही मिळतात. म्हणजेच पैसा आणि पद असा दुहेरी फायदा होतो. शिवाय पै-पाहुण्यांचे, मुलाबाळांचे कल्याण करता येते असे वाटते. राजकारण आता लोकांचा व्यवसाय झाला आहे. शून्य भांडवलातून हा व्यवसाय चालू करता येतो. शिवाय … Read more

सुप्रीम कोर्टाच्या दिलासामुळे राज्यात केवळ ‘ईडी’ सरकार – हेमंत पाटील

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या सत्तांतर नाटकाचा पहिला अध्याय संपला आहे.पहिल्या अंका नंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. पंरतु, बंडखोर शिवसेना गट आणि मुळ शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत तुर्त सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटाचे पारडे जड झाल्याने एकनाथ – देवेंद्र यांचे ‘ईडी’ सरकार टिकेल, असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत … Read more

गुजरात दंगलीचे पाप झाकण्यासाठीच स्व. अहमद पटेलांवर भाजपाकडून गलिच्छ आरोप ! : नाना पटोले

मुंबई (दि. १६ जुलै २०२२) : काँग्रेस नेते स्व. अहमद पटेल यांच्यावर भाजपाने केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. २००२ च्या गुजरात दंगलीने नरेंद्र मोदींची डागाळलेली प्रतिमा स्वच्छ करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. गुजरात दंगलीवेळी राजधर्माचे पालन केले नाही म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही मोदींना तीव्र शब्दात फटकारले होते. गुजरात दंगलीचे हे पाप झाकण्यासाठीच काँग्रेसवर … Read more

गोवा येथील तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांच्या २ जागा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २ जागा – फील्ड मेडिकल ऑफिसर (FDMO) पदाच्या जागा शैक्षणिक पात्रता – सदर भरती करिता उमेदवार बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (M.B.B.S.) अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा. अर्ज करण्याची शेवटची … Read more

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर

नवी दिल्‍ली, 30 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 685 उमेदवारांपैकी 60 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारापैकी जवळपास 10 टक्के महाराष्ट्रातून आहेत. यावर्षीच्या निकालात महिलांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातूनही महिला उमेदवार पुढे आहेत. राज्यातून प्रियंवदा म्हडाळकर प्रथम तर अंजली श्रोत्रीय यांचा दूस-या क्रमांक आहे. देशभरातील गुणानूक्रमानुसार या … Read more

देवेंद्र फडवणीसांनी त्यांच्या पाळीव ‘पडळकरांना’ आवरावे – हेमंत पाटील

पडळकरांच्या भ्रष्टाचाराच्या फाईली देण्यास प्रशासनाचा नकार सांगली (तारीख २८ मे) : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यामान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाळीव गोपीचंद पडळकरांना आवरावे, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केले आहे. केवळ फुक्कट प्रसिद्धी साठी फडणवीसांचे ‘पाळीव’ पडळकर राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यावर खालच्या स्तरात टीका करीत असतात. … Read more

राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे यांच्या विरोधात उमेदवारी ?

sambhajiraje1

शिवसेना नुकसान सोसायला तयार आहे का? कोल्हापूर(मुख्य प्रतिनिधी): महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणुका होणार आहेत. आकड्यांचा खेळ भाजपकडे दोन आहेत. आणि महाविकास आघाडीच्या तीन पक्षांपैकी (काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना) प्रत्येकी एक उमेदवार विजयी होणे जवळपास निश्चित आहे. सहाव्या सीटसाठी कोणताही पक्ष एकट्याने आपला उमेदवार जिंकू शकत नाही. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचे … Read more

कोल्हापुरात पराभव दिसताच भाजपा कडून मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न ! : अतुल लोंढे

भाजपा कार्यकर्ते रोख रक्कम व मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव होत असल्याचे स्पष्ट आहे. पराभव दिसू लागताच भाजपाकडून साम, दाम, दंड, भेदचा वापर केल्याचे स्पष्ट झाले असून मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा प्रकार काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे उघड झाला आहे. निवडणूक आयोगानेही याची योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश … Read more

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या!: नाना पटोले 

मुंबई, दि. ९ एप्रिल २०२२ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात सामाजिक न्यायाची स्थापना केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांच्या याच सामाजिक न्यायाची भूमिका नंतर संविधानात घेतली. अमेरिकेनेही त्याच धर्तीवर सकारात्मक कृती योजनेच्या माध्यमातून ती राबवली. याचा सर्वांगिण विचार करता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, अशी … Read more

समान नागरी कायद्यासाठी आरक्षण संपवण्याचा भाजपाचा डाव:  नाना पटोले

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका नको   मुंबई : देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आरक्षण संपवण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव असून त्याची सुरुवात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपवण्यापासून होत आहे. परंतु ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घेऊ नयेत अशीच काँग्रेस पक्षाची तसेच महाविकास आघाडीची भूमिका आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस … Read more

error: Content is protected !!