पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजारांबाबत नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

मुरगूड ( शशी दरेकर ) : सध्या पावसाळा सुरू झाल्याने जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. मुरगूड नगरपरिषद कडुन शुध्द व स्वच्छ पाणीपुरवठा केला जात आहे तथापी अति पावसामुळे गढूळ पाणी पुरवठा झालेस , कॉलरा, टायफॉइड, कावीळ यांसारख्या  जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी नागरिकांनी १५ ते २० मिनिटे पाणी … Read more

पेठवडगाव हादरले! कौटुंबिक वादातून भरदिवसा पत्नीची हत्या

पेठवडगाव : पेठवडगाव येथे भरदिवसा एका महिलेची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे. सावर्डे येथील कुटुंबाशी ही घटना संबंधित असल्याचे समजते. पत्नीचा खून तिच्या पतीनेच केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे, मात्र पोलीस प्रशासनाकडून … Read more

best-selling-products-on-amazon-Maharashtra

महाराष्ट्रातील (विशेषतः कोल्हापूर परिसरातील) ग्राहकांमध्ये सध्या अमेझॉनवर लोकप्रिय असलेल्या आणि उत्तम रेटिंग मिळालेल्या काही वस्तूंची यादी खालीलप्रमाणे आहे: १. इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) आजच्या काळात दर्जेदार ऑडिओ आणि पोर्टेबल उपकरणांना मोठी मागणी आहे. २. घरगुती उपकरणे (Home & Kitchen Appliances) स्वयंपाकघरातील कामात मदत होईल अशा उपकरणांना घराघरातून मोठी मागणी असते. ३. पुस्तके (Literature & Personal Growth) वाचकवर्गात … Read more

गुन्हेगारीला खतपाणी घालणारी अंधश्रद्धा कशाला ?

अघोरी विचारातून रस्त्यावर लिंबू-मिरची टाकल्याने, करणीमुळे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते, अघोरी विधी केल्याने शत्रूचा नायनाट होतो किंवा चमत्काराने आजार बरा होतो, अशा समजुती जेव्हा माणसाच्या विवेकावर मात करतात, तेव्हा अंधश्रद्धा ही केवळ वैयक्तिक श्रद्धेची बाब राहत नाही; ती गुन्हेगारीला खतपाणी घालणारी सामाजिक समस्या बनते. भीती, असहायता आणि अज्ञान यांचा गैरफायदा घेत विकृत भोंदू बाबा, मांत्रिक … Read more

कोल्हापुरात शाहू मिल परिसरात संरक्षक भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक शाहू मिल परिसरात आज अचानक एक संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली. या अनपेक्षित प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. भिंत कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस, भिंतीचे जुने झालेले बांधकाम किंवा देखभालीचा अभाव या कारणांमुळे ही दुर्घटना घडली … Read more

जिल्ह्यातील 60 बंधारे पाण्याखाली दूधगंगा 6.28 टीएमसी वारणा 17.88 टीएमसी राधानगरी धरणात 4.60 टीएमसी पाणीसाठा

कोल्हापूर : जिल्ह्यातील दूधगंगा 6.28 टीएमसी, वारणा 17.88 टीएमसी, राधानगरी धरणात 4.60 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून  पाण्याचा विसर्ग निरंक आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, हळदी, खडक कोगे व राशिवडे,  तुळशी नदीवरील- कसबा बीड, आरे व बाचणी,  कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगांव, … Read more

पंतप्रधान इंटर्नशिप (PMinternship) योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज सुरू

कोल्हापूर : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, देशातील १८ ते २५ वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र युवकांना ६ ते ९ महिन्यांची इंटर्नशिप देण्यात येणार असून, दरमहा ९,००० रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या पोर्टलवर प्रोफाइल तयार … Read more

आळंदीत इंद्रायणी नदीला पूर; वारकऱ्यांना आळंदीकडे न येण्याचे प्रशासनाचे आवाहन

आळंदी : आषाढी वारी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी सज्ज असलेल्या आळंदी शहरात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. या परिस्थितीमुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही, असे आळंदी नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. जे वारकरी आणि भाविक आधीच … Read more

जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी कोल्हापूर ते जालना ‘संघर्ष यात्रा’

कोल्हापुर : कोल्हापुरात ओबीसी सेवा फाउंडेशन संलग्न ओबीसी जनमोर्चाची नुकतीच एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. देशात जातीनिहाय जनगणना व्हावी, ही मागणी ओबीसी समाजाकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे, मात्र सरकारकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. या मागणीसाठी सरकारवर दबाव वाढवण्यासाठी कोल्हापूर ते जालना अशी ‘जातिनिहाय जनगणना संघर्ष यात्रा’ काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. … Read more

मुसळधार पावसाचा फटका: वंदूर-सिद्धनेर्ली बंधारा पाण्याखाली, वाहतूक ठप्प

कागल / प्रतिनिधी : गेली चार दिवस झाले पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुसळधार पावसाने दूधगंगा नदी ओव्हर फ्लो झाले आहे. झपाट्याने वाढणाऱ्या पाणी पातळीने वंदूर – सिध्दनेर्ली दरम्यान चा बंधारा पाण्या खाली गेला आहे. हा बंधारा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. प्रशासन यंत्रणा सतर्क ठेवणेत आली आहे.         वंदूर- सिध्दनेर्ली दरम्यानच्या दुधगगा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा … Read more

error: Content is protected !!