करदात्यांना मोठा दिलासा! आयटीआर भरण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली, पण सर्वांसाठी नाही

नवी दिल्ली: जर तुम्ही अद्याप तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल केला नसेल, तर काही करदात्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सरकारने या वर्षी ठराविक श्रेणीतील करदात्यांसाठी आयटीआर (ITR) भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलैवरून वाढवून ३१ ऑगस्ट २०२६ अशी केली आहे. म्हणजेच, या करदात्यांना रिटर्न भरण्यासाठी आता एक महिन्याचा जादा वेळ मिळणार आहे. मात्र, ही सवलत … Read more

माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांचा सन्मान; 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

कोल्हापूर : जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा तसेच त्यांच्या पाल्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी धनराशी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज व आवश्यक कागदपत्रे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा … Read more

निधन वार्ता – चाँदखान जमादार

मुरगूड (ता कागल ) येथील चाँदखान बा जमादार (वय ७८) यांचे दुःखद निधन झाले. पै. बाळासाहेब दादासाहेब जमादार विकास सेवा संस्था मुरगूड चे ते संचालक होते. तसेच मुरगूड विद्यालयातील लिपिक मजहर जमादार यांचे ते वडील होते. जियारत विधी उद्या गुरुवारी मुरगूड मध्ये आहे.

सरपिराजीराव पतपेढीला ५३ लाख २५ हजारावर निव्वळ नफा – चेअरमन हरिश्चंद्र साळोखे

पतपेढीची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न सभासदांना १८ टक्के लाभांशा सह २ टक्के व्याज रिबेट देणार – चेअरमन हरिश्चंद्र  साळोखे यांची घोषणा मुरगूड (शशी दरेकर) : कागल येथील सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी कागल या संस्थेची ९१ वी वार्षिक सर्व साधारण सभा  मगर सांस्कृतिक सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेची सुरुवात चेअरमन श्री. हरिश्चंद्र साळोखे,व्हा. चेअरमन … Read more

वाघापूरच्या विठ्ठल बिरदेव ओवीकार मंडळाकडून टेंभुर्णी येथे बाळूमामाच्या तळावर हरिजागर

मडीलगे (जोतीराम पोवार) – वाघापूर तालुका भुदरगड येथील विठ्ठल बिरदेव बाळूमामा ओविकार मंडळाकडून बाळूमामाच्या बगा क्रमांक 15 टेंभुर्णी तालुका पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त धनगरी गाण्यांच्या ओव्यातून नुकताच हरी जागर मोठ्या उत्साहात व भक्ती भावात पार पडला. यावेळी वाघापूरचे सुप्रसिद्ध ओविकार रामचंद्र डोणे, शिवाजी डोणे, सत्याप्पा डोणे लक्ष्मण पडवळे, विठ्ठल पडवळे, यांनी बाळूमामाच्या जीवन चरित्र … Read more

कागल तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘जनसेवा सप्ताह’

विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन कागल (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून कागल तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तालुक्यात ‘जनसेवा सप्ताह’ जाहीर करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि विद्यार्थीभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, कागल येथील ‘स्वर्गीय गणपतराव गाताडे बौद्धिक आश्रम विद्यालय’ … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ४८ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ४८ दिनांक २५-०७-२०२६ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २७ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

केडीसीसीचा दंड संजयबाबा घाटगे गटाचे कार्यकर्तेच भरणार..!

व्हनाळी :  केनवडे ता. कागल येथे उभारलेला श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स लिमिटेड हा कारखाना कार्यकर्त्यांना स्वास्थ देण्यासाठीच माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी स्वतःची मालमत्ता तारण देऊन आम्हा कार्यकर्त्यांचे हित जोपासण्यासाठी उभा केला आहे. संजयबाबा घाटगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नेहमी स्वतःचा श्वास समजून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. आज अन्नपुर्णा कारखान्यासाठी कर्ज घेतले म्हणून केडीसीसी … Read more

केडीसी बँकेला कोणतीही तोशीस लागू देणार नसल्याची संजयबाबा घाटगे यांची ग्वाही

केडीसी बँकेला लावलेला दंड भरण्याची माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची तयारी – मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (केडीसीसी) लावलेला दंड भरण्याची तयारी माजी आमदार आणि बँकेचे तज्ज्ञ संचालक संजयबाबा घाटगे यांनी दर्शविली आहे. बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे स्पष्टीकरण दिले … Read more

“मंदिर व्यवस्थापनात पारदर्शकता ठेवा आणि वारकऱ्यांना विश्वासात घ्या”; नंदवाळ येथे पत्रकार परिषदेत मागणी

प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ (ता. करवीर) येथील श्री विठ्ठल मंदिरावरून सध्या स्थानिक राजकारण तापू लागले आहे. मंदिराच्या विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या जुन्या आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सध्याच्या मंदिर व्यवस्थापनाकडून डावलले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण आणि स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.या संदर्भात नंदवाळ येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात … Read more

error: Content is protected !!