मुरगूडातील केवळ २ किमी अंतराच्या  कामासाठी तब्बल साडेचार महिने, संतप्त नगरसेवकांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना धरले धारेवर

गडहिंग्लज – कागल रस्त्याच्या पूर्ततेसाठी पुन्हा तिसरी बैठक, कामाच्या पुर्ततेसाठी २ ऑगस्ट नवी डेडलाईन मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड शहरातील केवळ २ किमी अंतराच्या  कामासाठी तब्बल साडेचार महिन्याहून अधिक काळ उलटल्यामुळे नगरसेवक संतापले. बैठकीत नगरसेवकांनी रस्ते प्रकल्प अधिकाऱ्यांना चांगलेच  धारेवर धरले. शहरातील रस्ता २ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन रस्ता प्रकल्प विभागाचे ॲथॉरिटी इंजिनियर … Read more

कागल तहसीलदार कार्यालयात वाद; माझ्यावर खोटा गुन्हा दाखल, राज कांबळेंचा पत्रकार परिषदेत दावा

कागल (प्रतिनिधी) : सामाजिक कामासाठी मी तहसीलदार कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी किरकोळ वादावादीचा प्रकार घडला. त्यातून त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. तो पूर्णपणे चुकीचा आहे. न्याय दंडाधिकारी सारख्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात जाऊन माझ्यावर गुन्हा दाखल करणे हे पूर्णतः चुकीचे आहे. त्यांच्या दालनातील सीसी टीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर सत्य समोर येईल. उलट या कार्यालयात कोणतेही काम … Read more

नामदार हसन मुश्रीफ यांची विशेष मुलाखत

प्रश्न : साहेब, तुमच्या बालपणाबद्दल आणि शिक्षणाबद्दल काही सांगाल का ? हसन मुश्रीफ : माझा जन्म २४ मार्च १९५३ रोजी रामनवमीच्या दिवशी झाला. माझे प्राथमिक शिक्षण श्रीमंत हिंदूराव घाटगे विद्यालयात झाले आणि माध्यमिक शिक्षण श्री शाहू हायस्कूल, कागल येथे झाले. त्यानंतर मी राजाराम कॉलेजमधून बी.ए. ऑनर्स (सोशियोलॉजी) ही पदवी घेतली. बालपणात माझे वडील खूप कडक … Read more

पावसाळ्यासाठी उपयुक्त अशा १० गॅजेट्सबद्दल माहिती

पावसाळ्यासाठी उपयुक्त अशा १० गॅजेट्सबद्दल माहिती देत आहेत. हे सर्व प्रॉडक्ट्स Amazon वर उपलब्ध आहेत. पावसाळ्यासाठी उपयुक्त गॅजेट्स: कार मिरर फिल्म (Car Mirror Film): पावसाळ्यात कारच्या साईड मिररवर पाणी साचू नये आणि स्पष्ट दिसण्यासाठी ही फिल्म लावली जाते. ओलिओफोबिक स्प्रे (Oleophobic Spray): हेल्मेट किंवा चष्म्याच्या काचेवर पाणी टिकू नये म्हणून हा स्प्रे वापरला जातो. पोर्टेबल … Read more

कर्जमुक्तीची व्यापकता वाढली; दोन लाखांचे कर्ज सर्वांना माफ

शेतकरी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, उत्पादन खर्चातील सातत्याने होणारी वाढ आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणे ही केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक जबाबदारी असल्याची भूमिका राज्य शासनाने सातत्याने घेतली आहे. त्याच भूमिकेचा अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक आविष्कार … Read more

प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे आरोग्यासाठी घातक का आहे?

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सहज उपलब्ध होणारी प्लास्टिकची पाण्याची बाटली सर्रास वापरतो. पण तुम्हाला माहीत आहे का, ही सोयीची वाटणारी बाटली आपल्या आरोग्यासाठी ‘सायलेंट किलर‘ ठरू शकते? अनेक संशोधनांतून असे समोर आले आहे की, प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. प्लास्टिक बाटल्यांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम: १. मायक्रोप्लास्टिक्स आणि नॅनोप्लास्टिक्स: प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिताना … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ४६ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ४६ दिनांक १३-०७-२०२६ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २७ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

निधन वार्ता – माधवी चव्हाण

मुरगूड ता. कागल येथिल माधवी मारुती चव्हाण वय ५९ यांचे आकस्मित निधन झाले. दूरध्वनी खात्यातील कर्मचारी मारुती चव्हाण यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती एक मुलगा दोन मुली नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या रविवार दिनांक १२ -७-२०२६ रोजी ९ वाजता मुरगूड येथे आहे.

राज्याच्या आरोग्य विभागातील  १५ हजार कंत्राटी कर्मचारी होणार शासकीय सेवेत समाविष्ट : माजी खासदार प्रा. संजय मंडलिक

राज्य संघटनेकडून माजी खासदार मंडलिक यांचा सत्कार वेतनासाठी ११५३  कोटी रुपये खर्चास शासनाची मान्यता कोल्हापूर जिल्ह्यातील ६५०  कर्मचा-यांना लाभ मुरगूड (शशी दरेकर) : आरोग्य विभागाकडे कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवेत असणाऱ्या १५ हजार १० कर्मचाऱ्यांना शासकिय सेवेत समविष्ठ करण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व  पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी  सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास … Read more

कागलमध्ये घराची भिंत कोसळून ३८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

कागल: कागल शहरातील लोहार गल्ली येथे राहत्या घराची भिंत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात ३८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, उर्मिला उदय कुलकर्णी असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी रात्री साधारण १०.४५ च्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. अचानक घराची भिंत कोसळल्याने उर्मिला कुलकर्णी यांच्या अंगावर पडली, ज्यात त्या गंभीर जखमी … Read more

error: Content is protected !!