उजळाईवाडीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा मोठा छापा

२२ किलो गांजासह तिघांना अटक, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर: करवीर तालुक्यातील उजळाईवाडी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने एक मोठी कारवाई करत तब्बल २२ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गांजा, एक चारचाकी, एक दुचाकी आणि तीन मोबाईल हँडसेट असा एकूण १२ लाख ७० हजार रुपयांचा … Read more

१४४५.९७ कोटींच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ

मंदिर जतन, वारसा संवर्धन, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखड्यांतर्गत १४४५.९७ कोटी रुपयांच्या मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासाच्या विविध कामांच्या कोनशीलेचे अनावरण करून … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ४३ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ४३ दिनांक २०-०६-२०२६ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २७ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

मुरगूडमध्ये स्मार्ट मीटरविरुद्ध महावितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा

स्मार्ट मीटर जोडणी थांबवा अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा ! मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर व परिसरात सध्या वीज महावितरण कंपनीकडून छुप्या पद्धतीने स्मार्टमीटर बसविण्याची मोहिम सुरु आहे यास तीव्र विरोध करीत वीजग्राहकांकडून मुरगूड विभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला .          हुतात्मा तुकाराम चौकातून हा मोर्चा वीज कंपनीच्या  विभागीय कार्यालयावर आला यावेळी … Read more

घोडा गाडी पलटी होवुन गाडी मालक मयत

कसबा सांगाव येथील घटना कागल / प्रतिनिधी :  अचानक घोडा उधळला आणि गाडी पलटी झाली. डोक्याला गंभीर मार लागल्याने घोडा गाडी मालकाचा मृत्यू झाला. ही घटना तारीख 18 रोजी रात्री 8.30 वाजणेच्या सुमारास कसबा सांगाव तालुका कागल येथे घडली. वासिम आब्बास कलावंत वय वर्षे -36,राहणार- कलावंत मळा – कसबा सांगाव असे मयत घोडागाडी मालकाचे नाव … Read more

कन्नड सक्ती विरोधात  ठाकरे, शिवसेनेचे आंदोलन

कागल /प्रतिनिधी : कन्नड सक्तीच्या विरोधात 22 जून रोजी बेळगाव येथील जिल्हाधिकार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. 29 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलन करण्यात येणार आहे सदरचे आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने करण्यात येईल या दोन्ही आंदोलनामध्ये उबाठा शिवसेना सर्व शक्तीनिशी सहभागी असेल, अशी माहिती उबाठाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी … Read more

गांधीनगरमध्ये दारू-गांजाच्या नशेत वायरमनचा राडा!

पोलिसांशी धक्काबुक्की, नागरिकांकडून बेदम मारहाण कोल्हापुर : करवीर तालुक्यातील गांधीनगर येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. दारू आणि गांजाच्या नशेत असलेल्या महावितरणच्या (वीज वितरण कंपनी) वायरमननी रस्त्यावर प्रचंड धुडगूस घातल्याचा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वीज वितरण कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी एका निष्पाप दुचाकीस्वाराला रस्त्यावर अडवून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांचा हा … Read more

Sandalwood & Saffron Magic Soap

Ghar Soaps (घर सोप्स) चे Sandalwood & Saffron Magic Soap (चंदन आणि केशर मॅजिक सोप) आहे. हे एक हँडमेड, पॅराबेन-फ्री साबण असून त्वचा उजळण्यासाठी (Skin Brightening) आणि टॅन घालवण्यासाठी (Tan Removal) वापरले जाते. मुख्य वैशिष्ट्ये (Product Highlights) टॅनिंग आणि काळे डाग कमी होतात: अनेक ग्राहकांनी सांगितले आहे की, उन्हाळ्यामुळे किंवा प्रदूषणामुळे चेहऱ्यावर आणि शरीरावर आलेले … Read more

नदीतील पाणी उपसा बंदीविरोधात शेतकरी आक्रमक

सिंचन भवन कार्यालयासमोर आंदोलन! कोल्हापुर (प्रतिनिधी) : नदीतील पाणी उपसा करण्यावर प्रशासनाने घातलेल्या बंदीविरोधात शेतकरी आता पूर्णपणे आक्रमक झाले आहेत. या बंदीच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत सिंचन भवन कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला. “शेतकरी एकजुटीचा विजय असो”, “उपसा बंदी तातडीने रद्द झालीच पाहिजे”, अशा … Read more

फास्टॅगवरून कागल सीमा नाक्यावर राडा! ट्रकचालक आणि कर्मचाऱ्यांकडून परस्पर मारहाणीचे आरोप

कागल : निपाणीहून कोल्हापूरच्या दिशेने गुजरातकडे जाणाऱ्या एका ट्रकच्या फास्टॅग स्कॅनिंगवरून कागल येथील आरटीओ टोल नाक्यावर मोठा वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या वादाचे पर्यावसान थेट मारहाणीत झाले असून, दोन्ही बाजूंकडून परस्पर विरोधी आरोप करण्यात येत आहेत. निपाणी मोटर चालक मालक संघटनेचे सचिव सचिन जोते यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या संघटनेचा एक ट्रक निपाणीहून गुजरातच्या … Read more

error: Content is protected !!