हिंदु-मुस्लिम हे भारतीय परंपरेचे खुप महत्त्वाचे खांब – प्रा. डाॅ. भारती पाटील

मुरगूड (शशी दरेकर) -19 व्या शतकामध्ये फुले दाम्पंत्याने मुलींसाठी, अस्पृश्यांसाठी शाळांची निर्मिती केली तसेच रात्र शाळा, शिक्षणशाळा सुरू केल्या. अशा 18 शाळांची निर्मिती फुले दाम्पंत्याने केली. महात्मा फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःच्या पत्नीला शिकवून पहिल्यांदा साक्षर केले त्यामुळे त्या आद्यशिक्षिका बनल्या. तर मुस्लिम धर्मात शिक्षणाबद्दल अनास्था असताना सुद्धा फातिमा बेग सारख्या मुस्लिम महिलेने शिक्षणशाळा पुर्ण केली … Read more

जागतिक आरोग्य दिन

आरोग्य विभागातील सर्वांच्या दृष्टीने ७ एप्रिल हा दिवस महत्वाचा आहे. आरोग्य विभागात कार्यरत असताना नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभ ७ एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनाच्या कार्यक्रमाने होतो. जागतिक अरोग्य संघटना ७ एप्रिल या दिवसासाठी सन १९५० पासून एक घोष वाक्याची निवड करते. कारण सर्व जगाचे लक्ष वेधून त्याबाबत जनजागृती व्हावी, हा त्यामागील मुख्य हेतू असतो. ७ एप्रिल … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

राज्यातील अनुसुचित जाती / नवबौध्द प्रवर्गातील शेतक-यांना सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच ही योजना शंभर टक्के राज्य पुरस्कृत आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी विकास अधिकारी व पंचायत समितीच्या कृषी अधिकारी मार्फत ही योजना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. योजनेची व्याप्ती : राज्यातील मुंबई वगळता इतर सर्व … Read more

शिवरायांचे, शाहुचे विचार बुद्ध धम्माशी सुसंगत – डॉ. सुभाष देसाई

मुरगूड (शशी दरेकर) : श्रेष्ठता जन्मावर नाही तर कर्मावर अवलंबुन असते यावर गौतम बुद्धांचा ठाम विश्वास होता त्यामुळे गौतम बुद्धांनी मृतीपुजा व चातुवर्ण व्यवस्था नाकारली. अगदी त्याचप्रमाणे शिवरायांनी, शाहु महाराजांनी कर्मकांड मानले नाही जातीव्यवस्था मानली नाही तर सर्वांना एकत्रित घेऊन स्वराज्यांचा कारभार पाहीला. त्यामुळे शिवरायांचे, शाहुंचे विचार हे बौद्ध धम्माशी सुसंगत आहेत असे मत डॉ … Read more

रोजेकरांना ‘समरजीत घाटगे’ नी दिल्या शुभेच्छा

कागल – सध्या सुरू असलेल्या मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर उपवास करीत आहेत. रविवारी सायंकाळी कागल शहरातील मुख्य मस्जिदमध्ये जाऊन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांंनी रोजेकरानां खजूर देत उपवास सोडण्यासाठी शुभेच्छा दिल्या. येथील दर्गा हाल मध्ये आयोजित इफ्तार पार्टीत सहभागी झाले. मुस्लीम बांंधवाबरोबर स्नेहभोजनही घेतले व संवाद साधला. यावेळी विविध मान्यवरासह मुस्लीम बांंधव मोठ्या संख्येने उपस्थित … Read more

सामाजिक अनारोग्य हा भारता समोरील गंभीर प्रश्न – प्रा. डॉ. भालबा विभुते

मुरगूड ( शशी दरेकर ) : महात्मा फुले हे मानवतावादाचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते.त्यांनी संपूर्ण आयुष्य सामाजिक समता निर्माण करण्यासाठी खर्ची घातले.संविधानाने निरपेक्षतेच तत्वज्ञान स्वीकारले आहे. नविन शैक्षणिक धोरणाच्या तरतुदीमध्ये सर्व मुल्यांचा समावेश आहे पण धर्मनिरपेक्षता हे मुल्य वगळले आहे त्याचबरोबर अभ्यासक्रमातुन गांधी,नेहरूंना वगळून अभ्यासाचे ओझे कमी करत असल्याचे कारण अभ्यासक्रम मंडळ देत आहे … Read more

पियुष मगदूम याने पटकावले राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक

बामणी (प्रतिनिधी) : बामणी ता. कागल येथील पियुष जयराम मगदूम याने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले. राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुल, मुल येथे या स्पर्धा झाल्या. ६७ किलो खालील वजन गटात तो या स्पर्धेत कोल्हापूर विभागामार्फत सहभागी झाला होता. एकूण … Read more

पाण्यावर खर्च केलेले 2 लाख पाण्यात !

सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील ग्रामपंचायतीने 15 व्या वित्त अयोगातून सुमारे 2 लाखापेक्षा अधिक खर्च करून पाण्याच्या टाकीजवळ क्लोरीन डोसर व टी. सी. एल मेडिक्लेअर यंत्रणा बसवली होती.  ही यंत्रणा गेल्या वर्षभरापासून बंद असवस्थेत मोडकळीस येऊन पडली आहे. याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष करून लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा केलेला आहे. सिद्धनेर्ली … Read more

सामाजिक आणि पर्यावरणाच्या प्रदुषणाने वर्तमानकाळ गुदमरतोय – प्रा. डॉ. अर्जुन कुंभार

मुरगूड ( शशी दरेकर ) – सध्या देशाची वाटचाल विनाशाच्या दिशेने होत आहे.आरोग्य,शिक्षण,उद्योग-व्यवसाय,शेती व पर्यावरण हा देशातील मुलभुत गरजा प्राधान्यक्रम असायला पाहिजेत पण मुलभुत गरजांना दुर्लक्षित करून धर्मव्यवस्थेचे समर्थन मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्रत्येक धर्मांधतेचा अंतिम मुक्काम तालिबान असतो.आपल्या देशाची वाटचाल सुद्धा तालिबानी प्रवृत्तीच्या दिशेने चालली आहे अशा ह्या सामाजिक आणि पर्यावरणीय प्रदूषणामुळे वर्तमानकाळ गुदमरतो … Read more

समाजवादी प्रबोधिनीची मुरगूड मध्ये 34 वी व्याख्यानमाला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे दि 11 ते 14 अखेर आयोजन मुरगूड ( शशी दरेकर ) : वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजीच्या मुरगूड शाखेच्या वतीने मंगळवार दिनांक 11 एप्रिल ते शुक्रवार दिनांक 14 एप्रिल अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे हे 34 वे वर्ष आहे. व्याख्यानमाला विश्वनाथराव पाटील खुले … Read more

error: Content is protected !!