कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात उद्भवलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानी साठी राज्य शासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 17 कोटी 42 लाख 5 हजार इतका निधी पूरबाधित नागरिकांना आगाऊ मदत देण्यासाठी प्राप्त झाला आहे. तसेच लवकरच प्राप्त होणारा निधी टप्प्या-टप्प्याने बाधितांना वितरीत करण्यात येणार आहे.
![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2021/08/DS-Patsanstha-MSCB-bill-scaled.jpg)
पूरामुळे जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. पूरबाधित नागरिकांना मदत मिळावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रयत्न केले. या प्रयत्नामुळे जिल्ह्याला 17 कोटी 42 लाख 5 हजार इतका निधी प्राप्त झाला आहे. त्या-त्या तालुक्यातील बाधित नागरिकांना मदत देण्यासाठी हा निधी संबंधित तहसिलदार यांना वितरीत करण्यात येणार आहे.
आर्थिक मदत देण्यात येणारे तालुके पुढीलप्रमाणे-(रक्कम लाखांमध्ये) करवीर-640, गगनबावडा-7.50, आजरा-2.20, शाहूवाडी-37.35, पन्हाळा-78.575, राधानगरी-5.75, भुदरगड-10.20, चंदगड-10.275, गडहिंग्लज-47.95, कागल-60.525, शिरोळ-507.85, हातकणंगले-133.675, अपर तहसिलदार इचलकरंजी-200.2 अशी एकूण 17 कोटी 42 लाख 5 हजार येवढी मदत सानुग्रह अनुदान म्हणून बाधितांना देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात मिळून सुमारे 69 हजार 682 कुटुंबे बाधित झाली आहेत. यापैकी करवीर तालुक्यात ग्रामीण 10 हजार 935 व शहर 14 हजार 665 अशी सुमारे 25 हजार 600 कुटुंबे, गगनबावडा(ग्रामीण) -300, आजरा (ग्रामीण) -88, शाहूवाडी (ग्रामीण)-1 हजार 494, पन्हाळा (ग्रामीण)-3 हजार 143, राधानगरी (ग्रामीण)-230, भुदरगड (ग्रामीण)-408, चंदगड (ग्रामीण)-411, गडहिंग्लज ग्रामीण 1 हजार 542 व शहर 376 अशी 1 हजार 918 कुटुंबे, कागल ग्रामीण 2 हजार 206 व शहर 215 अशी -2 हजार 421 कुटुंबे, शिरोळ ग्रामीण 16 हजार 361 व शहर 3 हजार 953 अशी एकूण -20 हजार 314 कुटुंबे, हातकणंगले (ग्रामीण)-5 हजार 347 तर अपर तहसिलदार इचलकरंजी येथे ग्रामीण 3 हजार 32 व शहर 4 हजार 976 अशा 8 हजार 8 एवढ्या कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार लवकरच हा निधी संबंधितांना वितरीत करण्यात येईल.