बातमी

राधानगरी धरणातून इतक्या क्युसेक्सचा विसर्ग की जिल्ह्यातील 2 बंधारे पाण्याखाली

 

कोल्हापूर, दि. 24 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 236.08 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये आज राधानगरी-236.08, तुळशी -98.20, वारणा -974.19, दूधगंगा-719.12, कासारी- 78.04, कडवी -70.30, कुंभी-76.88, पाटगाव 104.97, चिकोत्रा- 43.12, चित्री -53.12, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -37.70, जांबरे- 23.230 आंबेआहोळ – 30.978  इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे – राजाराम 15.7, फूट, सुर्वे- 18, रुई 43.6, इचलकरंजी 40, तेरवाड 38.3, शिरोळ -28.3  तर नृसिंहवाडी 29 फूट इतकी पाणी पातळी आहे.

जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील – रुई व इचलकरंजी  हे 2 बंधारे पाण्याखाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *