व्यवस्था बदलण्याचे केजरीवाल यांचे स्वप्न भंगले

भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या नेत्याला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत करून जनतेने फार मोठी चूक केली. या निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने आम आदमी पक्षाचे सरकार पाडले. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या पक्षाचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. केजरीवाल प्रामाणिकपणाने लढले. सत्याने लढले. कणखरपणे लढले. त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत देशातील भ्रष्ट मंडळींनी एक होऊन … Read more

Advertisements

कॉ. पानसरे नी प्रतिगाम्यांशी टोकाचा संघर्ष केला

20 फेब्रुवारी 2015 रोजी महाराष्ट्रातील थोर विचारवंत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांचा मृत्यू झाला. कॉ. पानसरे व त्यांच्या पत्नीवर सकाळी फिरावयास गेल्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी खुनी हल्ला झाला. चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. सारे कोल्हापूर शहर आणि महाराष्ट्र हादरला. त्यांच्या स्मारकाचे नुकतेच कोल्हापुरात उद्घाटन झाले. ज्या दिवशी कॉम्रेड पानसरे यांच्यावर … Read more

सध्याचे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अस्वस्थ करणारे

सध्याचे महाराष्ट्रातील वातावरण अस्वस्थ करणारे आहे. राजकीय, सामाजिक, धार्मिक या सर्व क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात वातावरण गढूळ झाले आहे. महागाई, शेतकऱ्यांच्या मालाला दर नसणे, बेरोजगारी, भ्रष्टाचार, दंगली, महिलांची असुरक्षितता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा यामुळे महाराष्ट्र कधी नव्हता इतका अस्वस्थ आहे. त्यातच सर्व प्रकाराची चॅनेल कळीचे मुद्दे सारखे सारखे दाखवून गोंधळात भर घालत आहेत. वातावरण कलुषित … Read more

गांधीजी मारूनही मरत नाहीत हे प्रतिगाम्यांचे दुखणे

gandhiji

30 जानेवारी 2023 ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या खुनाला 75 वर्षे पूर्ण होतात. इतकी वर्ष होऊनही गांधीजींच्या खुनाला जबाबदार असणारी गोडसेवादी हिंसक प्रवृत्ती आपण गांधींना मारून चूक केली हे कबूल करीत नाहीत. उलट महात्मा गांधीजींची टवाळी करणे, गांधीजींना दोष देणे, प्रसारमाध्यमातून गांधीजींची बदनामी करणे कमी झालेले नाही. गांधीजींच्या खुनाचे समर्थन करून आपण किती निर्लज्ज आहोत … Read more

गुजरात साठी भाजपने दिला दिल्लीचा बळी ?

नुकत्याच झालेल्या गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने लक्षणीय यश मिळवले. गुजरातच्या निवडणुकीत भाजपने जे एकतर्फी यश मिळवले आहे त्यामागे भाजपने गुजरातसाठी दिल्लीचा त्याग केला असे वाटत आहे. पण वास्तविक, प्रत्यक्षपणे काहीही म्हणता येत नाही. पण राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास हे वास्तव दिसते. दिल्ली एमसीडीमध्ये आम आदमी पक्षाने यश मिळवले पण प्रत्यक्षात दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत … Read more

शिस्तबद्ध निवडणूकीसाठी हवेत शेषन सारखे अधिकारी

या देशातील जनतेने आणि पुढारी लोकांनी टी. एन. शेषन सारख्या जबरदस्त अधिकार्‍यांचा शिस्तबद्ध कामाचा बडगा पाहिला आहे. शेषन हा भला माणूस होता. देशातील निवडणूकामध्ये शिस्त असावी अशी जबरदस्त इच्छाशक्ती असलेला निर्भय अधिकारी. आपल्या कडक शिस्तीखाली अनेक निवडणूका घेऊन स्वत:चे वलय निर्माण केलेला एक जबरदस्त अधिकारी होऊन गेला. देशाच्या राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानापेक्षा लोकप्रियता मिळविण्यामध्ये शेषन यशस्वी … Read more

सामाजिक सुधारणेचे अग्रदुत – ‘महात्मा’ जोतिबा फूले

हजारो वर्षापासुन मुक्या जनावाराप्रमाणे राबणार्‍या व जाती व्यवस्थेचे जोखड खांद्यावर वाहणार्‍या लाखो लोकांना जीवनमुक्तीने देणारा मुक्तीदाता म्हणजे महात्मा जोतिबा फुले होय. माहात्मा फुले राष्ट्रपुरुष तर आहेतच पण ते आधुनिक युगातील महामानव होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महान राष्ट्रपुरुष महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानीत. बाबासाहेबांचे तीन गुरु. भगवान गौतम बुध्द, संत कबीर आणि फुले या तीन … Read more

ईडीचे आरोप असलेले नेते घेऊन फिरण्यात कसला पराक्रम

सध्या महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप, आरएसएस, राज्यपाल, ईडी व सत्ता असा सामना चालला आहे. उद्धव ठाकरे पाच शत्रू बरोबर एकटे लढताना दिसतात. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस अशी युती असताना काँग्रेस व राष्ट्रवादी या चाललेल्या भांडणात काही बोलत नाहीत. सारेच मूग गिळून बसले आहेत. सत्ता तिघा पक्षांनी भोगली पण अडचणीत शिवसेना एकटी सापडली … Read more

शिक्षणातील लूट थांबवा अन्यथा युवकांचा उद्रेक होईल

दहावी-बारावीच्या परीक्षांचा बोर्डाचा निकाल जाहीर झाला. लाखो विद्यार्थी पास झाले. पालकांना मुलांच्या भावी शिक्षणासाठी कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा याची चिंता लागली. महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा मोठा प्रसार झाला. अनेक समाजसुधारकांनी, राष्ट्रपुरुषांनी शिक्षण सर्वांना मिळाले पाहिजे यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पंजाबराव देशमुख, … Read more

विदेशातून काळा पैसा नव्हे मोदींनाच परत आणा

भरपूर श्रम आहेत पण पुरेपूर मोबदला नाही, भरपूर माणुसकी आहे पण पोटभर खायला अन्न नाही, शाळा आहेत पण शिक्षण घेण्याची ताकद नाही, भरपूर दवाखाने आहेत पण उपचार घेण्यासाठी व औषधासाठी पैसे नाहीत, पाण्याची धरणे आहेत पण शेतीमालाला दर नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. गेल्या दहा वर्षातील महागाईने रेकॉर्ड मोडले … Read more

error: Content is protected !!