शेतकऱ्यांसाठी अपघात विमा बाबत मोठी बातमी

मुंबई : शेती करताना नैसर्गिक अपघातग्रस्त शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळतो. विमा कंपनीमार्फत प्रस्ताव मंजुरीला दिरंगाई होत असल्याने अनेक शेतकरी कुटुंब या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. आता ही योजना शासनामार्फत राबविण्याचा विचार आहे, अशी माहीती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

कोल्हापूर, दि. 2 : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजूर कुटूंबांना कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी 2 एकर बागायत किंवा 4 एकर जिराईत जमीन 100 टक्के अनुदान स्वरुपात देण्यात येते, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे. अनुसूचित जातीच्या … Read more

व्यापाऱ्यांवर अन्याय होवू न देता श्री अंबाबाई मंदिर परिसरातील कामांचे नियोजन करा – राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

विकास कामांसाठी शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करा कोल्हापूर, दि. 2 : श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विकास कामांचे नियोजन करताना शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करा. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून या परिसरातील कामांचे नियोजन करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश … Read more

छत्रपती शिवराय म्हणजे योद्धा – सदगुरूदास महाराज

शिवगड अध्यात्म चॅरीटेबल ट्रस्टचा नववा वर्धापनदिन उत्साहात मुरगूड (शशी दरेकर) : छत्रपती शिवराय जसे आदर्श राजा व आदर्श योद्धा होते तसेच ते वृत्तीने योगी होते. सर्व सुखाच्या गोष्टी त्याग करून फक्त रयतेसाठी व धर्मासाठी आपले जीवन त्यांनी वाहिले होते असे आदर्श व्यक्तिमत्व जगाच्या इतिहासात पाहायला मिळत नाही. असे विचार श्री सदगुरूदास महाराज नागपूर यांनी मुरगुड … Read more

विविधरंगी कोल्हापूर खुली छायाचित्र स्पर्धेसाठी 13 मार्चपर्यंत छायाचित्रे पाठवावीत

सर्वोत्कृष्ट छायाचित्रकारांना अनुक्रमे 51, 35, 21 हजार रुपयांचे पारितोषिक कोल्हापूर दि. 1 : पर्यटनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याची जागतिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे व पर्यटन विषयक बाबींवर आधारित ‘विविधरंगी कोल्हापूर..!’ खुली छायाचित्र स्पर्धा 2023 आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून निवड होणाऱ्या छायाचित्रांचा समावेश जिल्ह्याच्या कॉफी … Read more

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात ” जागर मायबोलीचा ” कार्यक्रम उत्साहात

मुरगूड (शशी दरेकर) : येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय अंतर्गत मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित आयोजित केलेला ” जागर मायबोलीचा ” हा कार्यक्रम उसाहाच्या वातावरणात पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जून कुभार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थांनी होते. तर विचारपीठावर प्रा. डॉ. शिवाजीराव होडगे, ज्येष्ठ साहित्यिक भैरवनाथ डवरी उपस्थित होते. प्रारंभी महाविद्यालयाचे संस्थापक खासदार दिवंगत … Read more

कागल शहराच्या विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा बळी देऊ नये

शेतकऱ्यांची आग्रही मागणी कागल :  कागल नगरपरिषदेच्या नवीन प्रस्तावित विकास आराखडाला विरोध दर्शवण्यासाठी एकदिवसीय उपोषणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या उपोषणाला कागल शहर परिसरातील आराखडा बाधीत सर्व शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी सदर विकास आराखडा रद्द करावा अशी एकमुखी मागणी करण्यात आली. कागल नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात  शेतकऱ्यांवर अन्याय होत असून या आराखड्यात अल्पभूधारक … Read more

वनमित्र संस्थेकडून किल्ले रत्नदुर्ग स्वच्छता मोहीम संपन्न 

कागल (विक्रांत कोरे) : वनमित्र संस्था, करनूर ( ता. कागल ) यांच्यावतीने शिवजयंती निमित्त किल्ले रत्नदुर्ग, जिल्हा रत्नागिरी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. किल्ल्यावरती किल्ले स्वच्छता अभियान, शाहिरी कार्यक्रम, पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम स्वच्छता अभियानांतर्गत पार पडले.  यावेळी कागल, निपाणी, करनुर, आडी, कुरली, आप्पाचीवाडी, सांगाव, बामणी, लिंगनुर, कोल्हापूर येथील सुमारे 260 महिला व शिवभक्त उपस्थित … Read more

मराठी राजभाषा दिन (27 Feb)

मराठी राजभाषा दिन मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसा निमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटलं जातं. आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो. … Read more

गाडगेबाबांनी आपल्या कृतीशील कार्यातून समाजवादी विचारांची पेरणी केली – प्रसाद कुलकर्णी

मुरगूड ( शशी दरेकर ) – राज्यघटनेतील मुल्ये राज्यघटनेच्या निर्मीती पुर्वी गाडगेबाबां स्वतः किर्तनातून मांडत असत आणि ती मुल्ये ते आचरत ही असत. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी केले . ते वनश्री मोफत रोपवाटिका मुरगूड च्या वतिने आयोजित “निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या १४७ व्या जयंती ” कार्यक्रम प्रसंगी … Read more

error: Content is protected !!