मुरगूड येथील प्रविण सुर्यवंशी यांना वृक्षमित्र समाजभूषण पुरस्कार

मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगुड (ता.कागल) येथील पर्यावरण संवर्धनाच्या उद्दात हेतूने गेल्या २५ वर्षात ४ लाख रोपांची निर्मिती करून त्याचे मोफत वाटप करून पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत गेले दोन तप आपल्या जीवनाला वाहून घेतलेल्या मुरगूड येथील वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांना २०२३ चा राजार्षि शाहू प्रेरणा गौरव सन्मान राज्यस्तरीय वृक्षमित्र समाजभूषण पुरस्कार २०२३ ने सन्मानित … Read more

Advertisements

सरवडेच्या जिज्ञासा प्री -प्रायमरी स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : सरवडे ता. राधानगरी येथिल जिज्ञासा प्री -प्रायमरी स्कूलमध्ये बालचमुंनीं आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा केला.श्री. विठ्ठल -रूक्मिणी, वारकरी , तर कोणी संतांच्या वेषभूषा परिधान केल्या होत्या. यावेळी टाळ – मृदुंग, भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन बघून जणू पंढरपूरच्या वारीत असल्याचे जाणवत होते .यावेळी कार्यक्रमात सरवडेगावच्या … Read more

बकरी ईद दिवशीच 30 हजार रुपये किंमतीचा बोकड डि पी ला शाॅक लागून जागीच मरण

मुरगूड (शशी दरेकर) : कापशी ता कागल येथे माय्याप्पा डोणे यांचा कळप कापशी लिंगनुर रस्त्याने जात असताना रस्त्याच्या साईटला विद्युत डी पी होता. रस्त्याने जात असताना कळपातील एक बकरे त्या डीपी खाली चरण्यासाठी गेले. डीपीला करंट उतरल्यामुळे तो करंट बकऱ्याला लागून बकरे मरण पावले. ही घटना यशवंत क्रांती संघटना कागल तालुका उपाध्यक्ष मा श्री सिध्दू … Read more

मुरगूड मधील बोगस डॉक्टर कदम यांना अटक

30 जून पर्यंत पोलीस कोठडी मुरगूड (शशी दरेकर) : रुग्ण महिलांशी लगट करून गैरवर्तन करत त्यांच्या चित्रफिती बनवणाऱ्या बोगस डॉक्टरला बुधवारी कागल पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिलीय. दत्तात्रय शामराव कदम (मुरगूड, ता. कागल) असं त्याचं नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दत्तात्रय कदम याचा मुरगूड येथे आयुर्वेदिक … Read more

येशीला पार्क येथे घरफोडी ३ लाखाचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

कागल : कागल येथील शाहु कारखाना ऑफिस मागे, एशिला पार्क समोर राहणारे तलाठी दिंगबर विष्णू कांबळे यांच्या घरी ३ लाखाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. दि. २५/०६/२०२३ रोजी संध्याकाळी ०५.०० वा. ते दि.२८/०६/२०२३ रोजी पहाटे ०१.१५ वा. चे दरम्यान प्लॉट नं. ३२ शाहु कारखाना ऑफिस मागे, एशिला पार्क समोर दिंगबर विष्णू कांबळे यांच्या राहत्या घरी मागील … Read more

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलीसांचे संचलन

मुरगूड (शशी दरेकर) : बकरी ईदच्या व आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलीसानीं बुधवारी सकाळी प्रमुख मार्गावरुन संचलन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील बाजारपेठेतून राजीव गांधी चौक, राणाप्रताप चौक, शिवतीर्थ, एस .टी स्टँड, ग्रामदैवत अंबाबाई मंदीर, हुतात्मा तुकाराम चौक या मार्गावरून संचलन करण्यात आले. कापशी, चिखली येथेही संचलन करण्यात आले. सहायक पोलीस … Read more

गाथा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ जगात सर्वश्रेष्ठ

आषाढी वारी आली की, पंढरपूर नगरीत भक्तांचा महापूर येतो. राबणारे शेतकरी तसेच सर्व स्तरातील लोक आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी आसुसलेले असतात. काही भक्त दिंडीतून पायी जातात, काही एसटी- बसने जातात, काही रेल्वेने जातात, काही स्पेशल गाड्या करून तसेच स्वतःच्या चार चाकी वाहनाने जातात. या वारीला पंढरपुरात प्रचंड गर्दी होते. महाराष्ट्र शासन, पोलीस खाते तसेच नगरपालिका … Read more

गहिनीनाथ समाचार अंक 48

E paper

गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. ‘गहिनीनाथ समाचार’ चे संस्थापक … Read more

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांमुळेच कोल्हापूरची ओळख जगभर

राजर्षी शाहू महाराजांना आमदार हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन कागल, दि.२६ (विक्रांत कोरे): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळेच कोल्हापूरची ओळख आणि लौकिक सबंध जगभर पोहोचलेला आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. राजर्षी शाहू महाराज यांच्या विचार आणि कृतीचे आचरण केल्यास स्वतःसह लोकजीवनही समृद्ध बनेल, असेही श्री मुश्रीफ म्हणाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या … Read more

मुलाने केली बापाला मारहाण

कागल : कागल येथे श्रमिक वसाहत मध्ये राहणारे अजय रामपाल निसाद (मूळचे उत्तरप्रदेश) यांना रतीभान अजय निसाद व अनिसादेवी अजय निसाद यांनी किरकोळ वादातून मारहाण केली. घटनेची माहिती पुढील प्रमाणे किरकोळ वाद झाले कारणाने रतीभान व अनिसादेवी यांनी अजय रामपाल निसाद यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच लाकडी बांबूने डोक्यात व पाठीत मारहाण करून … Read more

error: Content is protected !!