पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुरगूडमधे नालेसफाई व ओढ्यांची सफाई

मुरगूड ( शशी दरेकर ): पूरपरस्थिती अगोदर  मुख्याधिकारी अतिश वाळुंज यानीं नागरीकांनी केलेल्या मागणीने नगरपालिका कर्मचारी, समाजसेवकांच्या सहकार्याने ओढे -नाले  स्वच्छ करून घेतल्याने नागरीकात समाधान व्यक्त होत आहे. मुरगूड शहरामधील मुरगूड कुरणी रोडवरील दत्तप्रसाद मंगल कार्यालय येथे नदी पर्यंत असणाऱ्या ओढा आणि नाल्यांची स्वच्छता  नगरपालिका प्रशासनाने करून घेतली .त्यांना मुरगूड मधील सामाजिक कार्यकर्त्यानीं हातभार लावला. … Read more

कागल तालुक्यास अतिवृष्टीचा फटका बसला आहे नऊ घरांची पडझड व शेतीच्या पिकांचे अतोनात नुकसान

कागल/प्रतिनिधी : अतिवृष्टीचा फटका बसल्याने कागल तालुक्यात नऊ घरांची पडझड होऊन दोन लाख 17 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून तलाठी यांनी पंचनामे करून कागल तहसीलदार कार्यालयाकडे अहवाल सादर केले आहेत.              नुकसान झाल्याची नावे अशी, अनुक्रमे मुंगळी तालुका कागल येथील सागर काकासो कांबळे यांच्या घराची पडझड झाली आहे. अंदाजे नुकसान … Read more

गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यासमोर झाड कोसळले

वाहतूक विस्कळीत, कोणतीही हानी नाही गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : आज दिवसभर कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यासमोर असलेले एक मोठे जीर्ण झाड रस्त्यावर कोसळले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच, औद्योगिक वसाहत कामगारनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था केली. … Read more

कागल येथील अशोका हॉटेलसमोरील बोगदा वाहतूक कोंडीचे केंद्र

नागरिक संतप्त, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी कागल (सलीम शेख ) : कागल शहरातील अशोका हॉटेलसमोरील बोगदा (Underpass) सध्या वाहनचालकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाळ्यात या बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक वाहने बंद पडतात, ज्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. याशिवाय, संध्याकाळच्या वेळी येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले … Read more

सुळकूड येथे दुधगंगा नदीच्या जुन्या पुलावर पाणी; वाहतूक नवीन पुलामुळे सुरळीत

सुळकूड: गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुधगंगा नदीची पाणी पातळी वाढली असून, अनेक पुलांवर पाणी आल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे. आता सुळकूड येथील जुन्या पुलावरही लवकरच पाणी येण्याची शक्यता आहे. मात्र, सुदैवाने येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे वाहतूक सुरळीत सुरू राहणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली … Read more

‘नीरज चोप्रा’ पुस्तकासाठी संजय दुधाणेंना मसाप ग्रंथ पुरस्कार

पुणे: ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘नीरज चोप्रा’ या पुस्तकासाठी लेखक संजय दुधाणे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा (मसाप) प्रतिष्ठेचा ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १२० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला. दिल्लीच्या सुप्रसिद्ध … Read more

बाचणी येथे दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर

कोल्हापुर बाचणी मार्ग बंद बाचणी (तानाजी सोनाळकर) : दूधगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बाचणी-कोल्हापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे व्हणाली, साके, बेळवले खुर्द येथील वाहतूक ठप्प झाली असून, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. मे महिन्यातच दूधगंगा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा झाली आहे, तसेच पेरणी हंगामातच नदीला पूर आल्याने शेतकरी हवालदिल झाले … Read more

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको !

मान्सूनचा वेग मंदावणार, कृषी विभागाचं आवाहन मुंबई, दि. २५: यावर्षी मान्सूनने वेळेआधीच, म्हणजे २५ मे रोजी दक्षिण कोकणात धडक दिली असली तरी, आता त्याच्या प्रवासाची गती मंदावणार आहे. २७ मे पासून राज्यात हवामानात मोठे बदल अपेक्षित असून, कोरडे वातावरण आणि तापमानात वाढ दिसून येईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी, विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांनी, … Read more

मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने राष्ट्रीय महामार्गाची केली दाणादाण

अपूर्ण कामामुळे नागरिक त्रस्त कागल / प्रतिनिधी: यंदा मे महिन्यातच कोसळलेल्या विक्रमी मान्सूनपूर्व पावसाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः दुर्दशा केली आहे. कागलजवळ, विशेषतः दुधगंगा नदीजवळच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, त्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे किरकोळ अपघातही वाढले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर २४ तास वर्दळ असते. दळणवळणाचे … Read more

गोकुळ शिरगावच्या विकासाला ‘ब्रेक’ का ? शाहू महाराज नगर २० वर्षांपासून उपेक्षित!

२० वर्षांची प्रतीक्षा ! गोकुळ शिरगावच्या शाहू महाराज नगरचे दुःख कोण ऐकणार? गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव हे एक प्रगतशील गाव म्हणून ओळखले जाते. परंतु याच गावातील पूर्वेकडील छत्रपती शाहू महाराज नगर गेली २० वर्षे मूलभूत सुविधांच्या अभावामुळे विकासापासून दूर का राहिले आहे, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. येथील मुख्य … Read more

error: Content is protected !!