बिद्री साखर कारखान्याला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार प्रदान

मुरगूड (शशी दरेकर) : येथील श्री दूधगंगा सहकारी साखर कारखान्याला सन २०१९-२० हंगामाकरिता उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम  क्रमांकाचा पुरस्कार माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानीत करण्यात आले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेचा महाराष्ट्राच्या दक्षिण विभागातून हा पुरस्कार देण्यात आला . कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार प्रदान समारंभाच्यावेळी कारखान्याचे … Read more

Advertisements

UPSC परीक्षेत स्वप्नील तुकाराम माने याचा देशात 578 रँक आल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघांच्या वतीने माने याचा सत्कार

सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेणेत आलेल्या परीक्षेत स्वप्नील तुकाराम माने याचा देशात 578 रँक आल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघांच्या वतीने माने याचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राथमिक शिक्षक संघांचे अध्यक्ष राजाराम वरूटे, कोल्हापूर ज़िल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष बाजीराव कांबळे, संचालक प्रशांत पोतदार, मारुती दिंडे, कुमार सिध्दनेर्ली शाळेचे मुख्याध्यापक … Read more

लहानग्यांच्या चेहर्‍यावरील आनंद माझ्यासाठी सर्वोत्तम पुरस्कार : ना. हसन मुश्रीफ

मुश्रीफसाहेब आमच्या चिमुकल्यांसाठी तुम्हीच झालात देवदूत कागल, दि. ५ : लहानपणापासून विविध व्याधीग्रस्त बालके आणि त्यांची सैरभैर झालेली कुटूंबे पाहिली तेंव्हाच मनोमन शपथ घेतली की, आयुष्यात यापुढे सत्ता असो वा नसो, या बालकांच्या चेहर्‍यावरील हसू आणि त्यांच्या कुटूंबियांच्या चेहऱ्यावरील आनंद कधीही मावळू द्यायचा नाही.  त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद माझ्यासाठी सर्वोत्तम पुरस्कार आहे. असे प्रतिपादन ग्रामविकास व … Read more

संदिप बोटे यांना सामाजिक कार्यातून भविष्यात मोठी संधी : युवराज येडूरे

मुरगूड ( शशी दरेकर ) : स्वराज्य निर्माण चे संस्थापक संदिप बोटे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदानित कडबा कुट्टी मशीन वाटप करण्यात आली. मुरगूड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मा. कुमार ढेरे यांच्या हस्ते व महाराष्ट्र एन. जी. ओ समितीचे राज्याध्यक्ष्य मा. युवराज येडूरे, संजय गांधी निराधार समिती कागल चे माजी सदस्य मा. प्रताप पाटील यांच्या हस्ते … Read more

वाघापूर ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर

मडिलगे(जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता नुकतीच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली अकरा सदस्य संख्या असलेल्या सभागृहात यावेळी महिला राज पहावयास मिळणार आहे चार प्रभागात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून शासन आदेशानुसार पहिल्यांदाच राजकीय ओबीसी आरक्षणाशिवाय अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी एक जागा सोडल्यास बाकी दहा जागा ह्या सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी … Read more

पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून गेली चार वर्षे लोकसहभागातून व लोकवर्गणीतून वृक्षारोपण

सिध्दनेर्ली (श्रद्धा सुर्वे) : ता. कागल येथे ५ जून पर्यावरण दिन व ६ जून शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून गेली चार वर्षे लोकसहभागातून व लोकवर्गणीतून वृक्षारोपण सुरू आहे. याही वर्षी निसर्ग व पर्यावरण संघटना सिध्दनेर्ली यांच्या वतीने वस्ती ते नदि पात्रापर्यंत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वृक्षदिंडीचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. या वृक्षदिंडीत इंदिरा हायस्कूल चे … Read more

वृक्षारोपण आणि संगोपन हे प्रत्येकाचे कर्तव्य होय – राजेश्री बहेनजी

वृक्षारोपण

व्हनाळी(वार्ताहर) : वृक्षारोपण आणि संगोपण हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कारण वृक्ष ही सजीवांचेश्वसन स्त्रोत आहेत. म्हणूनच वृक्षांचे रोपण आणि संवर्धन म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण हे प्रत्येकाचं कर्तव्य बनल्याचे प्रतिपादन राजेश्री बहेनजी यांनी केले.केंबळी तालुका कागल येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा केंबळी यांच्या‌ वतीने आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. राजश्री … Read more

उद्या गैबी चौकात चार महामानवांच्या पुतळांचे ऐतिहासिक अनावरण समारंभ

कागल/ प्रतिनिधी : लोकनेते राज्याचे मंत्री हसन मुश्रीफसो यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात चार महामानवांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. या पुतळ्यांचा ऐतिहासिक अनावरण समारंभ शनिवारी तारीख 4 जून रोजी सायंकाळी चार वाजता होत आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा … Read more

धकाधकीच्या जीवनात परमार्था शिवाय तरणोपाय नाही – राजेश्री बहेनजी

केंबळी येथे शिवध्यान मंदिराचे भूमीपूजन व्हनाळी(सागर लोहार) : सत्ता आणि संपत्तीच्या हव्यासापोटी मनुष्य धकाधकीचे जीवन जगत आहे. या जीवनात आत्मिक समाधान हवे असेल परमार्था शिवाय तरणोपाय नसल्याचे प्रतिपादन कागल ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संचालिका राजश्री बहेनजी यांनी केले. केंबळी ,(ता. कागल) येथील बाळासाहेब कातकर शेतीफार्मवर शिव परमात्मा ध्यान कक्षाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. … Read more

गोरंबे येथे बांधकाम कामगार नोंदणीसह आरोग्य शिबिराला प्रतिसाद

पत्रकार शिवाजी पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिबिरात ३५० बांधकाम कामगारांची नोंदणी व आरोग्य तपासणी गोरंबे, दि.३: गोरंबे ता. कागल येथे बांधकाम कामगार नोंदणीसह बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी शिबिर झाले. यामध्ये ३५० बांधकाम कामगारांची नोंदणी व आरोग्य विषयक विविध तपासण्या झाल्या. पत्रकार शिवाजी पाटील फाउंडेशनच्यावतीने या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात पूर्ण शारीरिक तपासणी व … Read more

error: Content is protected !!