एकात्मिक फलोत्पादन माहिती पुस्तिका: शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक

महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी एक माहिती पुस्तिका तयार केली आहे. ही पुस्तिका फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पुस्तिकेत काय आहे? या माहिती पुस्तिकेत शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले आहे, ज्यात खालील प्रमुख घटक समाविष्ट आहेत: या पुस्तिकेमध्ये अभियानातील सर्व घटक, … Read more

Advertisements

शेतकऱ्यांसाठी दिलासा: कोल्हापुरात ‘लिंकिंग’शिवाय दर्जेदार खते मिळणार

कोल्हापूर: आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार आणि ‘लिंकिंग’शिवाय कृषी निविष्ठा (खते, बियाणे, कीटकनाशके) मिळाव्यात यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उत्पादक आणि विक्रेत्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खतपुरवठा आढावा बैठकीत ते बोलत होते. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात मंजूर कोट्यानुसार १०० टक्के खतांचा पुरवठा झाला असून, युरिया, डीएपी, एमओपी, संयुक्त खते आणि एसएसपी यांचा मुबलक … Read more

कोल्हापुरात शिवरायांच्या कर्तृत्वाला जिवंत देखाव्यातून उजाळा

कोल्हापूर, 6 जून: छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील एक महत्त्वाचा अध्याय, शिवराज्याभिषेक दिन, आज कोल्हापुरात कागलकर वाड्याच्या प्रांगणात अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने शिवशक राजदंड स्वराज्यगुढीची स्थापना करण्यात आली, जी शिवरायांच्या सार्वभौमत्वाची आणि रयतेच्या कल्याणाची प्रतीक आहे. सनई आणि पोवाड्यांच्या निनादात पार पडलेल्या या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचा मुख्य … Read more

सांगाव येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते ‘महाबीज’ सोयाबीन बियाणे वाटप; शेतकऱ्यांशी साधला संवाद

कोल्हापूर: कागल तालुक्यातील सांगाव येथे शुक्रवारी कृषी विभागामार्फत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर फुले किमया या उन्नत सोयाबीन वाणाच्या ‘महाबीज’ बियाण्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते हे बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी उपस्थित लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी बीजप्रक्रियेचे महत्त्व … Read more

समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा खुला; आता शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात आले. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे १६ तासांचे अंतर आता अवघ्या ८ तासांत कापता येणार आहे. या प्रसंगी बोलताना, समृद्धी महामार्गाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त करत, आता शक्तिपीठ महामार्गाचे काम लवकरच सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री … Read more

बोगस डीएपी खताच्या वाढत्या विक्रीवर नियंत्रण आणण्याची गरज: शेतकऱ्यांनो, सावधान !

मुंबई: सध्या शेतीत वापरल्या जाणाऱ्या डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खतामध्ये भेसळ आणि बोगस खतांची विक्री वाढल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, पिकांच्या उत्पादनावरही नकारात्मक परिणाम होत आहे. कृषी विभागाला यावर तातडीने लक्ष देण्याची आणि कठोर कारवाई करण्याची गरज आहे. बोगस डीएपी खत ओळखायचे कसे? शेतकऱ्यांनी डीएपी खत खरेदी करताना … Read more

सिद्धनेर्ली आणि व्हनाळी येथे ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ उत्साहात संपन्न!

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात १२ जून २०२५ पर्यंत राबविण्यात येत असलेल्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ अंतर्गत नुकतेच कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली आणि व्हनाळी येथे कृषीविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र, आत्मा (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा), कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक … Read more

भारतातील दुग्ध व्यवसाय धोक्यात

अमेरिकेचे स्वस्त दुग्धजन्य पदार्थ ठरणार आव्हान ? गेल्या काही वर्षांपासून भारतातील दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा आधार राहिला आहे. कोट्यवधी शेतकऱ्यांच्या उपजीविकेचं साधन असलेल्या या व्यवसायासमोर आता एक नवं आव्हान उभं ठाकण्याची शक्यता आहे, अमेरिकेकडून होणारी स्वस्त दुग्धजन्य पदार्थांची आयात. जर हे खरं ठरलं, तर भारतातील दुधाचे दर कोसळण्याची आणि त्याचा … Read more

सोयाबीनचे दर घसरणार ? तेलबियावरील आयात शुल्क कपातीमुळे शेतकरी चिंतेत

मोदी सरकार ने शेतकऱ्याच्या पोटात खंजीर खुपसला मुंबई, (२ मे): केंद्र सरकारने तेलबियावरील आयात शुल्कात कपात करण्याच्या निर्णयामुळे देशांतर्गत सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त करत आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करून, त्यांच्या पोटावर पाय दिल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. आयात शुल्क कपातीचा परिणाम: तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी … Read more

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको !

मान्सूनचा वेग मंदावणार, कृषी विभागाचं आवाहन मुंबई, दि. २५: यावर्षी मान्सूनने वेळेआधीच, म्हणजे २५ मे रोजी दक्षिण कोकणात धडक दिली असली तरी, आता त्याच्या प्रवासाची गती मंदावणार आहे. २७ मे पासून राज्यात हवामानात मोठे बदल अपेक्षित असून, कोरडे वातावरण आणि तापमानात वाढ दिसून येईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी, विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांनी, … Read more

error: Content is protected !!