गाथा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ जगात सर्वश्रेष्ठ

आषाढी वारी आली की, पंढरपूर नगरीत भक्तांचा महापूर येतो. राबणारे शेतकरी तसेच सर्व स्तरातील लोक आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी आसुसलेले असतात. काही भक्त दिंडीतून पायी जातात, काही एसटी- बसने जातात, काही रेल्वेने जातात, काही स्पेशल गाड्या करून तसेच स्वतःच्या चार चाकी वाहनाने जातात. या वारीला पंढरपुरात प्रचंड गर्दी होते. महाराष्ट्र शासन, पोलीस खाते तसेच नगरपालिका … Read more

गहिनीनाथ समाचार अंक 48

E paper

गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. ‘गहिनीनाथ समाचार’ चे संस्थापक … Read more

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांमुळेच कोल्हापूरची ओळख जगभर

राजर्षी शाहू महाराजांना आमदार हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन कागल, दि.२६ (विक्रांत कोरे): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळेच कोल्हापूरची ओळख आणि लौकिक सबंध जगभर पोहोचलेला आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. राजर्षी शाहू महाराज यांच्या विचार आणि कृतीचे आचरण केल्यास स्वतःसह लोकजीवनही समृद्ध बनेल, असेही श्री मुश्रीफ म्हणाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या … Read more

मुलाने केली बापाला मारहाण

कागल : कागल येथे श्रमिक वसाहत मध्ये राहणारे अजय रामपाल निसाद (मूळचे उत्तरप्रदेश) यांना रतीभान अजय निसाद व अनिसादेवी अजय निसाद यांनी किरकोळ वादातून मारहाण केली. घटनेची माहिती पुढील प्रमाणे किरकोळ वाद झाले कारणाने रतीभान व अनिसादेवी यांनी अजय रामपाल निसाद यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच लाकडी बांबूने डोक्यात व पाठीत मारहाण करून … Read more

राज्यातील शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी (june 2023)

कोल्हापूर : भारतीय हवामान हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः ७ जूनच्या दरम्यान होणे अपेक्षित होते. यापूर्वी ११ जून २०२३ रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झालेले आहे. दि. २४ जून २०२३ रोजी राज्यात बहुतांश भागात पावसास सुरुवात झाली आहे. सध्यस्थितीत दि.२५ जून, २०२३ अखेर सरासरी पर्जन्यमान १७३ मिमी असून प्रत्यक्षात मात्र ४१.९ … Read more

दूरदृष्टीचा प्रजावत्सल राजा – राजर्षी छत्रपती शाहू महाराज

26 जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. छत्रपती शाहू महाराजांनी सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास केला. राज्य व देशाला समतेचा संदेश दिला. त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या लौकिकास शाहू महाराजांचे कार्य दिपस्तंभासारखे असून त्यांनी त्याकाळी घेतलेले निर्णय आजही त्यांच्या दूरदृष्टीपणाची साक्ष देतात. राजर्षी शाहू महाराजांनी शंभर … Read more

मुरगूडच्या व्यापारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी किरण गवाणकर व व्हा. चेअरमनपदी प्रकाश धोंडीराम सणगर यांची निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता. कागल येथील ” आदर्श सहकारी पतसंस्था ” गौरव पुरस्कार प्राप्त ” श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. किरण विठ्ठल गवाणकर यांची तर व्हा. चेअरमनपदी प्रकाश धोंडीराम सणगर यांची एकमताने निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कागल तालूका सहकारी संस्था सहायक निबंधक एस … Read more

लिव्ह इन वाल्या धाडसी मुलींनो टॉक्सिक नात्यातून लवकरात लवकर बाहेर पडणं गरजेचं

मागच्या सहा महिन्यात लिव्ह-इन पार्टनरची हत्या झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. आजकाल मुली आपल्या पसंतीचा जोडीदार निवडतात. पण आता प्रेमाच्या आणाभाका घेऊन त्यांची आयुष्यभरासाठी सोबत करतो म्हणणारे जोडीदारसुद्धा त्यांची हत्या करू लागलेत. समोर येणारी प्रत्येक घटना पहिल्या घटनेपेक्षा अधिक भयानक आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. आधी मुलीची हत्या केली जाते. नंतर तिचा मृतदेह छिन्नविछिन्न केला जातो. … Read more

सध्याचे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अस्वस्थ करणारे

सध्याचे महाराष्ट्रातील वातावरण अस्वस्थ करणारे आहे. राजकीय, सामाजिक, धार्मिक या सर्व क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात वातावरण गढूळ झाले आहे. महागाई, शेतकऱ्यांच्या मालाला दर नसणे, बेरोजगारी, भ्रष्टाचार, दंगली, महिलांची असुरक्षितता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा यामुळे महाराष्ट्र कधी नव्हता इतका अस्वस्थ आहे. त्यातच सर्व प्रकाराची चॅनेल कळीचे मुद्दे सारखे सारखे दाखवून गोंधळात भर घालत आहेत. वातावरण कलुषित … Read more

राजर्षींच्या नगरीत गुंडगिरीला थारा नको

गुन्हेगारी का वाढते आणि गुन्हेगारांना समाजात का प्रतिष्ठा मिळते याचा विचार करण्याची सध्या वेळ आली आहे. गुन्हेगारांना राजकीय पक्षात प्रतिष्ठेचे स्थान मिळताना दिसते. सध्याच्या काळात राजकारणात, धर्मकारणात गुन्हेगार सर्वत्र दिसतात. या गुन्हेगारांना प्रचंड पैसा पुरवला जातो. त्यामुळे राज्य कायद्याचे आणि न्यायाचे हवे असे वाटत असताना कायदा पाळणाऱ्यापेक्षा कायदा मोडणाऱ्या प्रवृत्ती जास्त दिसतात. देशात काही पक्षांनी … Read more

error: Content is protected !!