दहा वर्षे पूर्ण झालेले आधार कार्ड अद्यावत करा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

collector

कोल्हापूर दि. 3 : शासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार दर दहा वर्षांनी आधार कार्डवरील माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे आधार तयार होवून दहा वर्षे कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांनी आपल्या आधार कार्डवरील माहिती त्वरीत अद्ययावत करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. … Read more

मुरगूडात ५ मार्च रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन

मोठया बक्षिसांच्यामुळे शर्यतशौकिनामध्ये उत्सुकता मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथे विरेंद्र मंडलिक यांच्या वाढदिवासानिमित्य भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन गौरव समिती व राणा प्रताप क्रिडा मंडळाच्या वतीने रविवार ५ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात आले आहे. अशी माहिती संयोजकानीं पत्रकार परिषदेत दिली. या जनरल बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे प्रथम क्र … Read more

पतसंस्थामधील गैरव्यवहार रोखण्यासाठी सहकार तज्ज्ञांची समिती स्थापन करणार- सहकार मंत्री अतुल सावे

50 हजार रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याबाबतची योजना प्रस्तावित मुंबई, दि. 3 : गेल्या काही दिवसांपासून पतसंस्थांमधील गैरव्यवहार आणि ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यास येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनामार्फत पावले उचलण्यात येत आहेत. येणाऱ्या काळात या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी सहकार क्षेत्रातील तज्ञांना घेऊन लवकरच नवीन समिती येत्या 15 दिवसांमध्ये स्थापन करण्यात येईल, असे सहकार मंत्री अतुल … Read more

शेतकऱ्यांसाठी अपघात विमा बाबत मोठी बातमी

मुंबई : शेती करताना नैसर्गिक अपघातग्रस्त शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळतो. विमा कंपनीमार्फत प्रस्ताव मंजुरीला दिरंगाई होत असल्याने अनेक शेतकरी कुटुंब या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. आता ही योजना शासनामार्फत राबविण्याचा विचार आहे, अशी माहीती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

कोल्हापूर, दि. 2 : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजूर कुटूंबांना कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी 2 एकर बागायत किंवा 4 एकर जिराईत जमीन 100 टक्के अनुदान स्वरुपात देण्यात येते, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे. अनुसूचित जातीच्या … Read more

व्यापाऱ्यांवर अन्याय होवू न देता श्री अंबाबाई मंदिर परिसरातील कामांचे नियोजन करा – राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

विकास कामांसाठी शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करा कोल्हापूर, दि. 2 : श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विकास कामांचे नियोजन करताना शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करा. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून या परिसरातील कामांचे नियोजन करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश … Read more

छत्रपती शिवराय म्हणजे योद्धा – सदगुरूदास महाराज

शिवगड अध्यात्म चॅरीटेबल ट्रस्टचा नववा वर्धापनदिन उत्साहात मुरगूड (शशी दरेकर) : छत्रपती शिवराय जसे आदर्श राजा व आदर्श योद्धा होते तसेच ते वृत्तीने योगी होते. सर्व सुखाच्या गोष्टी त्याग करून फक्त रयतेसाठी व धर्मासाठी आपले जीवन त्यांनी वाहिले होते असे आदर्श व्यक्तिमत्व जगाच्या इतिहासात पाहायला मिळत नाही. असे विचार श्री सदगुरूदास महाराज नागपूर यांनी मुरगुड … Read more

विविधरंगी कोल्हापूर खुली छायाचित्र स्पर्धेसाठी 13 मार्चपर्यंत छायाचित्रे पाठवावीत

सर्वोत्कृष्ट छायाचित्रकारांना अनुक्रमे 51, 35, 21 हजार रुपयांचे पारितोषिक कोल्हापूर दि. 1 : पर्यटनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याची जागतिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे व पर्यटन विषयक बाबींवर आधारित ‘विविधरंगी कोल्हापूर..!’ खुली छायाचित्र स्पर्धा 2023 आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून निवड होणाऱ्या छायाचित्रांचा समावेश जिल्ह्याच्या कॉफी … Read more

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात ” जागर मायबोलीचा ” कार्यक्रम उत्साहात

मुरगूड (शशी दरेकर) : येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय अंतर्गत मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित आयोजित केलेला ” जागर मायबोलीचा ” हा कार्यक्रम उसाहाच्या वातावरणात पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जून कुभार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थांनी होते. तर विचारपीठावर प्रा. डॉ. शिवाजीराव होडगे, ज्येष्ठ साहित्यिक भैरवनाथ डवरी उपस्थित होते. प्रारंभी महाविद्यालयाचे संस्थापक खासदार दिवंगत … Read more

कागल शहराच्या विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा बळी देऊ नये

शेतकऱ्यांची आग्रही मागणी कागल :  कागल नगरपरिषदेच्या नवीन प्रस्तावित विकास आराखडाला विरोध दर्शवण्यासाठी एकदिवसीय उपोषणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या उपोषणाला कागल शहर परिसरातील आराखडा बाधीत सर्व शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी सदर विकास आराखडा रद्द करावा अशी एकमुखी मागणी करण्यात आली. कागल नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात  शेतकऱ्यांवर अन्याय होत असून या आराखड्यात अल्पभूधारक … Read more

error: Content is protected !!