कृषी बातमी

कृषी विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ –  कृषीमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.             ते म्हणाले, शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी कृषी पुरस्कारांच्या रकमेत […]

कृषी बातमी

दुबार पेरणीची वेळ आल्यास मोफत बियाणे उपलब्ध करून देणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे

शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य करणार मुंबई : राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होत असला, तरी मराठवाड्यासह ज्या भागात अपेक्षित पाऊस नसल्याने दुबार पेरणीची वेळ आली, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करुन दिले जाईल. शेतक-यांना आवश्यक ते सर्व सहाय्य करण्याची शासनाची भूमिका असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.             मराठवाडा व राज्यातील इतर जिल्ह्यांत जून महिन्यात […]

कृषी बातमी

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत नवीन प्रस्ताव १० ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत

कोल्हापूर, दि. 14 : राज्यातील फळे, भाजीपाला व फुलांच्या उत्पादनावर प्रक्रियेसह विपणन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात मॅग्नेट प्रकल्प कार्यान्वीत केलेला आहे. मॅग्नेट प्रकल्पांतर्गत नवीन प्रस्ताव सादर करण्यासाठी अर्जदारांनी विहीत नमुन्यातील अर्ज भरून चेकलिस्टप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून मॅग्नेट प्रकल्पाच्या प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (पी.आय.यु) तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, श्री. छत्रपती शाहू मार्केट यार्ड, […]

कृषी

रेशीम उत्पादनातून साधली बेले गावची प्रगती

रेशीम उत्पादक ते रेशीमरत्न पुरस्कारप्राप्त तानाजी बंडू पाटील यांची यशोगाथा कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती सहकारी साखर कारखान्या जवळ करवीर तालुक्यातील बेले हे साधारण तीन हजार लोकसंख्येचे गाव. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी गावांमध्ये ऊस हेच प्रमुख पीक घेतले जाते. करवीर तालुक्यातील बेले गावात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक असून गावातील दहा अल्पभूधारक शेतकऱ्यांनी उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून रेशीम शेतीला […]

कृषी बातमी

उन्हाळी हंगामात नाचणी उत्पादन : राज्यातला पहिलाच प्रयोग कोल्हापूरात यशस्वी

जागतिक स्तरावर पौष्टिक लघु तृणधान्य वर्ष साजरे केले जात असताना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात उन्हाळी हंगामात नाचणी उत्पादनाचा प्रयोग कशा पध्दतीने राज्य स्तरावरील पहिलाच प्रयोग ठरला याची ही यशोगाथा..  कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग अर्थात शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यामधे पूर्वापार खरीप हंगामात नाचणीचे पीक घेतले जाते. पुर्वीच्या काळी नाचणी पिकवणा-या प्रत्येकाच्या […]

कृषी बातमी

शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होण्याची वाट पाहाता काय ?

सागर कोंडेकर यांचा सवाल : वीज तोडल्याने कागलमधील शेतकरी आक्रमक, तोडलेली कनेक्शन तात्काळ जोडण्याची मागणी कागल (प्रतिनिधी) : वीज वितरण कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने सुरू केलेली वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम बंद न केल्यास शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होईल असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी दिला आहे. तसेच तोडण्यात आलेली कनेक्शन तात्काळ जोडण्यात यावीत अन्यथा […]

कृषी बातमी

कागल शहराच्या प्रस्तावित प्रारूप विकास आराखड्यात शेतकऱ्यांवर अन्याय

बाधित शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना दिले निवेदन शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्या कागल, दि. २१: कागल नगरपरिषदेने २५ जानेवारी २०२३ रोजी कागल शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे. सदर आराखड्यामध्ये अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होणार असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. याबाबतचे निवेदन संबंधित शेतकऱ्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा […]

कृषी बातमी

भरडधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्या – हेमंत पाटील

आधारभूत किंमत निश्चित करुन देण्याची मागणी मुंबई, २१ फेब्रुवारी २०२३ : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बळीराजाला सुगीचे दिवस आले आहेत. पंतप्रधानांचे नेतृत्व देशासह जगाला नवीन दिशा देणारे आहे, हे विशेष. यंदा भारताच्या आग्रहाखातर संपूर्ण जग ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरा करीत आहे. अशात देशातील भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाची आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी […]

कृषी बातमी

कोल्हापूरचा ‘कारभारी गोडवा’ ब्रँड सर्वदूर पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी रेखावार

कारभारवाडीला राज्यातील ‘आदर्श वाडी’ बनवणार कोल्हापूर, दि. 3 : महिलांच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सहभागाने गावाच्या शाश्वत विकासासाठी निर्माण होत असलेला कोल्हापूरचा ‘कारभारी गोडवा’ ब्रँड सर्वदूर पोहोचवून कारभारवाडी राज्यात ‘आदर्श वाडी’ बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला.   करवीर तालुक्यातील कारभारवाडीला आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भेट देवून गटशेती अंतर्गत […]