मुंबईत मुसळधार पाऊस (Mumbai rains) सुरूच राहणार, हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी!

मुंबई: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आज (गुरुवार, १९ जून २०२५) देखील जोर कायम ठेवला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, पुढील काही तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरांत जोरदार पावसाने (Mumbai rains) हजेरी लावली असून, काही सखल भागांमध्ये … Read more

अहमदाबाद विमान अपघात: डीएनए चाचणीद्वारे ३२ बळींची ओळख पटली

१४ बळींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अहमदाबाद : अहमदाबादमध्ये लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर तीन दिवसांनी, अधिकाऱ्यांनी आतापर्यंत डीएनए चाचणीद्वारे ३२ बळींची ओळख पटवली आहे आणि रविवारी, १५ जून रोजी. १२ जून रोजी झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या डीएनए जुळवण्याची प्रक्रिया सुरू … Read more

मुरगूडमध्ये प्रवीणसिंह पाटील यांच्या बैलाने तोडली कर्नाटकी बेंदूर सणाची ‘कर’!

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड तालुका कागल येथे कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा कर तोडण्याचा कार्यक्रम उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. मुरगूड चे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या बैलाने यावर्षी सदर कर भर पावसात तोडली. कर तोडण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. दिग्विजय पाटील, सत्यजित पाटील यांच्या समवेत पाटील कुटुंबीयातील सर्व … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३८ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३८ दिनांक २-०६-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

शेतकऱ्यांनो, परदेशातील शेती तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्या!

आता महिला शेतकरीही परदेशात जाऊन शिकणार! कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत ‘देशाबाहेरील अभ्यासदौरे’ ही योजना राबवली जात आहे. पुणे कृषी आयुक्तालयाच्या तंत्र अधिकाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे. यावर्षी, म्हणजेच सन 2025-26 मध्ये महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, … Read more

‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड आज ! नविद मुश्रीफ यांच्या नावाची जोरदार चर्चा

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आज (शुक्रवार, ३० मे रोजी) संचालक मंडळाची सभा होणार असून, या सभेत नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीला वेग आला आहे. गेले काही दिवस ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले … Read more

‘ऑगस्ट’चं धान्य ‘जून’मध्येच! लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

पावसाळ्यापूर्वी घ्या ऑगस्ट २०२५ पर्यंतचं धान्य: शासनाचं आवाहन मुंबई, दि. २९: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत मोफत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी टाळण्यासाठी, केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की, ऑगस्ट २०२५ पर्यंतचं अन्नधान्य आता ३० जून २०२५ पर्यंतच रास्तभाव दुकानांमधून … Read more

अवकाळी पावसाचा तडाखा: कोल्हापूर जिल्ह्यात तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

कोल्हापूर : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने शेती, फळपिके, घरे आणि गोठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. आज झालेल्या एका तातडीच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित या बैठकीत जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी … Read more

कागल तालुका बाजार समितीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही: मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कागल येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होणार नाही, असा कोणताही निर्णय राज्य शासनाने घेतलेला नाही, अशी माहिती राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. त्यामुळे या संदर्भात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आता कागल येथे आपला उपबाजार (sub-market) सुरू करणार आहे. यासाठी बाजार … Read more

११ वी प्रवेश प्रक्रिया: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

मुंबई : इयत्ता ११ वी (FYJC) प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ अंतर्गत २६ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन नोंदणी पोर्टल सुरू झाले आहे. या पोर्टलद्वारे पहिल्याच दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना ही प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण करता यावी … Read more

error: Content is protected !!