महाराष्ट्रात मंत्रिमंडळात भूकंप ?

जनमताचा रेटा अन् वादग्रस्त मंत्र्यांवर गाजणार गाज मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मंत्रिमंडळ विस्तारापेक्षाही खातेबदलाची चर्चा अधिक जोर धरत आहे. जनतेचा वाढता असंतोष आणि काही मंत्र्यांच्या सततच्या वादग्रस्त विधानांमुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी सत्ताधारी पक्ष आता खात्यांमध्ये मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाजाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या खातेबदलांबाबत … Read more

अंतराळ संशोधनातील शोधकता जोपासावी – प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) – अंतराळ संशोधनात नवनव्या संधी उपलब्ध होत असून त्याचा फायदा विद्यार्थी व तरुणांनी घ्यावा. तसेच अंतराळ संशोधनातील उच्चतम शोधकता जोपासावी. असे आवाहन प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी केले. ते गगनबावड्यातील पद्मश्री डॉ. ग .गो. जाधव महाविद्यालयात भौतिक शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या *सुभांशू शुक्ला एक अंतराळ सफर* या भितीपत्रकाच्या … Read more

‘गोकुळ’ची दूध उत्पादकांना मोठी भेट

म्हैस खरेदीसाठी आता 50,000 अनुदान! कोल्हापूर: ‘गोकुळ’ दूध संघाने आपल्या दूध उत्पादकांना मोठा आधार देणारा निर्णय जाहीर केला आहे. संघाच्या संचालक मंडळाच्या मुंबईतील बैठकीत परराज्यातून म्हैस खरेदी करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात 10,000 रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे हे अनुदान आता एकूण 50,000 रुपये झाले आहे. दूध उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्थैर्य … Read more

राजू शेट्टी-राजेश क्षीरसागर वाद चिघळला: ५०० एकर जमिनीच्या आरोपावरून राजकीय रणकंदन

जयसिंगपूर: कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात सध्या एका नव्या वादाने जोर धरला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर ५०० एकर जमीन असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर, राजू शेट्टी यांनी तो आरोप फेटाळत, २६ जुलै रोजी बिंदू चौकात स्वतः हजर राहून ती जमीन क्षीरसागर यांच्या नावावर करण्याचे जाहीर … Read more

बेरोजगार सेवा सहकारी संस्थांसाठी सुवर्णसंधी! कंत्राटी कामांसाठी ३१ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करा

कोल्हापूर, दि. २४ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे करवीर तालुक्यामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या १८ तालुकास्तरीय रोजगार मेळाव्यांसाठी अंदाजित ९,००,०००/- (अक्षरी रुपये नऊ लाख फक्त) आणि कार्यालयीन स्टेशनरीसाठी अंदाजित ५०,०००/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) असा एकूण ९,५०,०००/- (अक्षरी रुपये नऊ लाख पन्नास हजार फक्त) इतका अंदाजित खर्च अपेक्षित आहे. सदर कामे … Read more

Rishabh Pant ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे भारताला मोठा धक्का, मायकेल अथर्टन यांना मालिकेबाहेर होण्याची भीती

मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज Rishabh Pant ऋषभ पंतला फलंदाजी करताना पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला मैदान सोडावे लागले. या दुखापतीमुळे तो मालिकेबाहेर होण्याची शक्यता आहे, अशी चिंता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल अथर्टनने व्यक्त केली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना भारताने … Read more

बाचणी येथील रखडलेल्या पुलाच्या कामासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा इशारा

कागल (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आणि करवीर तालुक्यांना जोडणाऱ्या दुधगंगा नदीवरील बाचणी-वडशिवाले दरम्यानच्या नवीन पुलाचे काम गेली चार वर्षांपासून रखडले असून, हे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने केली आहे. हे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे आणि तालुकाप्रमुख अशोक … Read more

निधन वार्ता : श्रीमती हौसाबाई मारुती भूते

मुरगूड :मुरगूड येथील श्रीराम मंगल कार्यालय व भूते बंधू मंडप डेकोरेशनचे मालक रामचंद्र व विठ्ठल भूते यांच्या मातोश्री श्रीमती हौसाबाई मारुती भूते (वय ८३ ) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सूना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार दि. २५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.

तरुणांनी शिक्षण सोडून कोणत्याही वाममार्गाला जाऊ नये : स.पो. नि. शिवाजी करे

तरुणांच्या आयुष्यामध्ये नशा नको तर दिशा हवी मुरगुड ( शशी दरेकर ) : तरुणांच्या आयुष्यामध्ये नशा नको तर दिशा हवी असे प्रतिपादन मुरगूड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. शिवाजी करे यांनी केले. ते सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगुड मध्ये अंतर्गत तक्रार निवारण समितीमार्फत आयोजित केलेल्या अमली पदार्थ विरोधात झिरो मिशन अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये … Read more

कागल तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

कागल / प्रतिनिधी : कागल तालुक्यातील 83 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने जाहीर करणेत आले. तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी हे आरक्षण जाहीर केले. जाहीर केलेली आरक्षण सोडत ही सन 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी आहे.           कागल तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी सरपंच पदाची निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. पण आरक्षण ऐकताच काही ठिकाणी खुशी तर … Read more

error: Content is protected !!