वंदूर येथे अज्ञात जंगली प्राण्याच्या हल्ल्यात बारा बकरी ठार

कागल (विक्रांत कोरे) : वंदूर तालुका कागल येथील सदाशिव माळकर (धनगर )यांचे पकाली पानंद येथे शेत आहे. त्यांच्या शेतामध्ये सुरेश गंगाराम गोरडे यांची बकऱ्यांचा कळप गेले चार ते पाच दिवस खतासाठी बसवली आहेत. अज्ञात जंगली प्राण्याने बकऱ्यांच्या कळपावर हल्ला चढवून बारा बकरी ठार केली व अनेक बकरी जखमी अवस्थेत आहेत. यामुळे मेंढपाळांच्या भीतीचे वातावरण निर्माण … Read more

राष्ट्रीय महामार्गात शेतजमीन जाणाऱ्या प्राधिकरणातील गावांना चार पट मोबदला मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा – मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर :-कोल्हापूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी कोल्हापूर प्राधिकरणातील 42 गावांपैकी 7 गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या सात गावातील शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील भूसंपादनाप्रमाणे चार पट मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. तरी त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग व भूसंपादन विभाग यांनी शेतकऱ्यांच्या निवेदनानुसार वाढीव मोबदला मिळण्याबाबत चा प्रस्ताव शासनाला सादर करावा, अशा सूचना उच्च … Read more

गरजू रुग्णांनी जेनेरीक औषधांचा लाभ घ्यावा – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर दि. 6 : जेनेरीक औषधांच्या जनजागृतीसाठी 7 मार्च हा दिवस “जन औषधी दिवस” म्हणून साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्यवर्धिनी केंद्रात जन औषधी दिवस विषयावर व्यापक जनजागृतीसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रक्तदाब, मधुमेह आजाराची तपासणी होऊन औषधे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. उच्च रक्तदाब आणि मधुमेह रुग्णांसाठी वैद्यकीय अधिकारी व समुदाय आरोग्य … Read more

बाळेघोल येथील तरुणाचा गोळी झाडून खून

मुरगूड (शशी दरेकर) : कागल तालुक्यातील बाळेघोल येथील तरुणाचा गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खून केला.भरत बळीराम चव्हाण (वय ३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. काल सकाळी ही घटना घडली.भरतवर गोळी झाडणारा संशयीत आरोपी विकास हेमंत मोहिते (वय २५ ) हा स्वतःहून मुरगूड पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. काल सकाळी भरत चव्हाण सेनापती कापशीला कामासाठी आपल्या … Read more

यमगे ते मुरगुड खराब रस्त्यामुळे गर्भवती ऊसतोड मजूर महिलेची रस्त्यातच प्रसुती

प्रशासनाला आता तरी जाग येणार का ? नागरिकांतून संताप व्यक्त कागल तालुक्यातील यमगे मुरगुड दरम्यान खराब रस्त्यामुळे गर्भवती असणाऱ्या एका ऊसतोड मजूर महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना घडली. निपाणी फोंडा – राज्यमार्गावर खराब रस्तामुळे प्रवासादरम्यान महिलेच्या पोटात दुखायला लागले. तिला प्रसुती कळा सुरु झाल्य यमगे येथील प्राथमिक केंद्रातील आशासेविका सरिता धनाजी एकल यांना ही घटना … Read more

मोटारसायकल – कारच्या धडकेत लिंगनूर येथे तरुण ठार

लिंगनूर दु : भरधाव कारने समोरून मोटारसायकलला जोरात धडक दिल्याने प्रवीण मोहन गोंधळी (वय ३६, लिंगनूर दु) हा मोटारसायकलस्वार तरुण ठार झाला. सदर घटना शुक्रवार दि. ३ मार्च रोजी लिंगनूर दुमाला (ता.कागल) येथे घडली. गुन्ह्याची फिर्याद सचिन कामले (बागडी गल्ली, लिंगनूर दु) यांनी कागल पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक माहितीनुसार, मयत प्रवीण मोहन गोंधळी हा … Read more

दहा वर्षे पूर्ण झालेले आधार कार्ड अद्यावत करा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

collector

कोल्हापूर दि. 3 : शासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार दर दहा वर्षांनी आधार कार्डवरील माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे आधार तयार होवून दहा वर्षे कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांनी आपल्या आधार कार्डवरील माहिती त्वरीत अद्ययावत करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. … Read more

मुरगूडात ५ मार्च रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन

मोठया बक्षिसांच्यामुळे शर्यतशौकिनामध्ये उत्सुकता मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथे विरेंद्र मंडलिक यांच्या वाढदिवासानिमित्य भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन गौरव समिती व राणा प्रताप क्रिडा मंडळाच्या वतीने रविवार ५ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात आले आहे. अशी माहिती संयोजकानीं पत्रकार परिषदेत दिली. या जनरल बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे प्रथम क्र … Read more

पतसंस्थामधील गैरव्यवहार रोखण्यासाठी सहकार तज्ज्ञांची समिती स्थापन करणार- सहकार मंत्री अतुल सावे

50 हजार रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याबाबतची योजना प्रस्तावित मुंबई, दि. 3 : गेल्या काही दिवसांपासून पतसंस्थांमधील गैरव्यवहार आणि ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यास येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनामार्फत पावले उचलण्यात येत आहेत. येणाऱ्या काळात या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी सहकार क्षेत्रातील तज्ञांना घेऊन लवकरच नवीन समिती येत्या 15 दिवसांमध्ये स्थापन करण्यात येईल, असे सहकार मंत्री अतुल … Read more

शेतकऱ्यांसाठी अपघात विमा बाबत मोठी बातमी

मुंबई : शेती करताना नैसर्गिक अपघातग्रस्त शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळतो. विमा कंपनीमार्फत प्रस्ताव मंजुरीला दिरंगाई होत असल्याने अनेक शेतकरी कुटुंब या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. आता ही योजना शासनामार्फत राबविण्याचा विचार आहे, अशी माहीती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!