मंत्रालयात सामान्यांची धास्ती का? सामान्य नागरिकांचा मंत्रालयातील प्रवेशासाठी संघर्ष!

मुंबई: राज्याचे मंत्रालय, जे सामान्य जनता, गरीब, कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांच्या सेवेसाठी उभारले गेले आहे, त्याचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. कामांसाठी शेकडो किलोमीटर दूरवरून येणाऱ्या सामान्य माणसांना मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ओळखपत्र दाखवून, तासन् तास रांगेत उभे राहून आणि अनेक तपासण्या पार करून मंत्रालयात प्रवेश मिळतो. यामुळे मंत्रालयात येणाऱ्या … Read more

हसन मुश्रीफ गृहमंत्री होता-होता राहिले ; नरकातला स्वर्ग पुस्तकातून खळबळजनक खुलासा ! 

मुंबई : संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेदरम्यान हसन मुश्रीफ गृहमंत्री होता-होता राहिले, असा धक्कादायक खुलासा राऊत यांनी केला आहे. ‘धर्म आडवा आला’ असे सांगत त्यांनी शरद पवारांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी खासदार शिवसेना नेते संजय राऊत यांनी “नरकातला स्वर्ग” हे पुस्तक … Read more

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सावर्डे बु॥ चा तरुण ठार

परीक्षेला जातानां रितेशवर काळाचा घाला मुरगूड ( शशी दरेकर ) : माद्याळ ता. कागल गावाजवळ दुपारी १ वाजण्याच्या सुमारास संतोष राणे यांच्या शेताजवळ भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने सावर्डे बु || (ता. कागल ) येथिल मोटरसायकलस्वार रितेश तानाजी पाटील ( वय २१ ) हा जागीच ठार झाला. रितेश हा परिक्षेसाठी गडहिंग्लज येथे परिक्षेसाठी … Read more

मुरगूड परिसरात पावसाची हजेरी

शेतातील झाड उन्मळुन पडल्याने विद्युत तारा तुटल्या मुरगूड ( शशी दरेकर ) : बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुरगूड व मुरगूड परिसरात वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली. गेले आठ दिवस पावसाने हुलकावणी दिली होती. पण या पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकानां दिलासा मिळाला. मुरगूड येथिल बहीर्जी पेट्रोल पंपाजवळून गावभागाकडे जाणाऱ्या रोडशेजारी … Read more

गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे देणार का राजीनामा? डोंगळे एकाकी पडल्याची चर्चा

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या संभाव्य राजीनाम्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. डोंगळेना संघातील इतर संचालकांकडून पुरेसा पाठिंबा मिळत नसल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर, अध्यक्ष अरुण डोंगळे वगळता संघाच्या सर्व संचालकांनी एकत्रित बैठक घेतली. या बैठकीनंतर संचालकांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही सर्व एक संघ … Read more

बारा वर्षांच्या जिद्दीनंतर भरत झाला दहावी पास !

कोल्हापूर (सलीम शेख ) : शिक्षणाला वयाचं बंधन नसतं, हे भरत कांबळे या तरुणानं खरं करून दाखवलं आहे. तब्बल बारा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर भरतनं दहावीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची आस सोडली नाही आणि योग्य मार्गदर्शनामुळे आज भरतच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू आणि आत्मविश्वास दिसत आहे.भरतचं बालपण अत्यंत संघर्षमय परिस्थितीत गेलं. आई-वडिलांचं आधार नसताना … Read more

पावसाळ्यापूर्वी तयारी पूर्ण करा; विभागीय आयुक्तांचे प्रशासनाला आदेश

पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार पुणे : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागात प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी काल झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज राहण्याचे स्पष्ट निर्देश सर्व संबंधित विभागांना दिले. जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना … Read more

कागल औद्योगिक वसाहतीत दुचाकीस्वाराचा भिंतीला धडकून मृत्यू; इचलकरंजीतील युवक

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये बुधवारी मध्यरात्री भरधाव वेगात दुचाकी चालवल्याने झालेल्या अपघातात इचलकरंजी येथील 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवधूत युवराज सुतार असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अवधूत हा गोकुळ शिरगाव येथील एका कारखान्यात मालवाहतूक करत होता. बुधवारी रात्री त्याने आपला मालवाहनाचा टेम्पो कारखान्यात लावल्यानंतर मित्राची मोटरसायकल  … Read more

मुरगूड विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.६७ टक्के

सुरभी शहा मुरगूड केंद्रात दुसरी तर पत्रकार अनिल पाटील यांच्या कन्या आर्या व आदिती या जुळ्या बहीनीनी मिळवले लख्ख यश मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत येथील शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित,मुरगूड विद्यालय (ज्युनिअर कॉलेज) मुरगुड मधील सुरभी स्वप्निल शहा हिने ९७टक्के गुण … Read more

कणेरीवाडीत जलकुंभ सोहळा उत्साहात संपन्न

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कणेरीवाडी गावाचा अनेक वर्षांपासूनचा पाणीप्रश्न आता मार्गी लागणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या दोन भव्य जलकुंभांचे लोकार्पण नुकतेच खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. याप्रसंगी बोलताना शाहू महाराज म्हणाले, “कणेरीवाडीचा दीर्घकालीन पाणीप्रश्न सोडवणे हे केवळ सुविधा देणे नव्हे, तर खरं लोकशाहीचे काम आहे. या जलजीवन … Read more

error: Content is protected !!