सध्याचे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अस्वस्थ करणारे

सध्याचे महाराष्ट्रातील वातावरण अस्वस्थ करणारे आहे. राजकीय, सामाजिक, धार्मिक या सर्व क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात वातावरण गढूळ झाले आहे. महागाई, शेतकऱ्यांच्या मालाला दर नसणे, बेरोजगारी, भ्रष्टाचार, दंगली, महिलांची असुरक्षितता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा यामुळे महाराष्ट्र कधी नव्हता इतका अस्वस्थ आहे. त्यातच सर्व प्रकाराची चॅनेल कळीचे मुद्दे सारखे सारखे दाखवून गोंधळात भर घालत आहेत. वातावरण कलुषित … Read more

राजर्षींच्या नगरीत गुंडगिरीला थारा नको

गुन्हेगारी का वाढते आणि गुन्हेगारांना समाजात का प्रतिष्ठा मिळते याचा विचार करण्याची सध्या वेळ आली आहे. गुन्हेगारांना राजकीय पक्षात प्रतिष्ठेचे स्थान मिळताना दिसते. सध्याच्या काळात राजकारणात, धर्मकारणात गुन्हेगार सर्वत्र दिसतात. या गुन्हेगारांना प्रचंड पैसा पुरवला जातो. त्यामुळे राज्य कायद्याचे आणि न्यायाचे हवे असे वाटत असताना कायदा पाळणाऱ्यापेक्षा कायदा मोडणाऱ्या प्रवृत्ती जास्त दिसतात. देशात काही पक्षांनी … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी 5 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करा – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील

कोल्हापूर, दि. 21 : महिला व बाल विकास विभागाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार  सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ व सन २०२३-२४ या कालावधीच्या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती/संस्थाकडून दिनांक ५ जुलै २०२३ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी कळविले आहे. राज्यस्तरीय पुरस्कार :- एक लाख एक रुपये, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, … Read more

मानवी जीवन निरोगी व सुदृढ राहण्यासाठी योगाचे आचरण करणे गरजेचे – गजानन गंगापूरे

मुरगूड ( शशी दरेकर ) : मानवी जीवन निरोगी व सुदृढ राहण्यासाठी योगाचे आचरण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. गजानन गंगापुरे यानी केले. ते जागतीक योग दिनानिमित्य मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघाच्या विरंगुळा केद्रात बोलत होते. ते पुढे म्हणाले आपल्या देशाच्या यशस्वी प्रयत्नामुळेच संपूर्ण जगात २०१५पासून योग दिन साजरा होत असल्याचे … Read more

मुरगूडच्या बाजारात मोबाईल चोरीचे वाढते प्रमाण

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूडमध्ये मंगळवार बाजार दिवशी गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. मुरगूडचा बाजार हा मोठया प्रमाणात भरला जातो. आसपासच्या खेडया- पाड्यातून बाजारात भाजीपाला, किराणा व इतर खरेदीसाठी पुरुष् व महिला येत असतात त्यामुळे बाजारामध्ये खूप गर्दी असते. त्याचा फायदा घेऊन मोबाईल चोर मोबाईलची चोरी करतात. गेल्या बाजारा दिवशी … Read more

सैनिक मुलांच्या वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु

कोल्हापूर, दि. 20 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिक मुला/मुलींच्या वसतीगृहामध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येत असून दि. 1 जून 2023 पासून प्रवेश पुस्तिकांची विक्री सुरु करण्यात आली आहे. प्रथम प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 असून सर्व युध्द विधवा, इतर माजी सैनिक विधवा, माजी सैनिक व त्यांची … Read more

आषाढवारी निमित्त वाहनांना पथकरातून सूट

वारकऱ्यांनी सवलत प्रवेश प्रमाणपत्र जारी करुन घ्यावे – प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील कोल्हापूर, दि. 20 : आषाढीवारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठी पथकरातून सूट देण्यासाठी भाविक व वारकऱ्यांसाठी सवलत प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी व वारकऱ्यांनी हे सवलत प्रवेश प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर कर्यालयातून कार्यालयीन वेळेमध्ये सर्व … Read more

गहिनीनाथ समाचार अंक ४७

E paper

गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर हि आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. ‘गहिनीनाथ समाचार’ चे … Read more

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत जयसिंगराव तलाव गाळमुक्त

कागल : शासनाच्या ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत कागल येथील ऐतिहासिक जयसिंगराव तलावातील गाळ काढण्याच्या काम सुरू आहे. यावेळी गाळ काढल्यानंतर तलाव लवकर भरण्यासाठी आवश्यक असलेल्या चरीच्या काँक्रीट अस्तरीकरणाचा प्रस्ताव शासन दरबारी देण्यात आला आहे. दूधगंगेच्या डाव्या कालव्यातून जयसिंगराव तलावात पाणी सोडण्यासाठी 450 मिलिमीटर व्यासाचे पाईपचे गेट कालव्यावर आहे. परंतु या गेटपासून तलावात पाणी येण्याचा … Read more

कागलमधील वाळलेल्या ऊसांचे तात्काळ पंचनामे करा – सागर कोंडेकर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या सागर कोंडेकर यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी कागल : कागल तालुक्यातील पाण्याअभावी वाळलेल्या ऊसाचे तात्काळ पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना विनाविलंब नुकसान भरपाई द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदार शिल्पा ठोकडे, तसेच तालुका कृषी अधिकारी भिंगारदिवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कागल तालुक्यातील नदी,कालवे, विहीरीच्या पाण्यावर हजारो एकरातील पिके अवलंबून आहेत. माञ, … Read more

error: Content is protected !!