शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको !

मान्सूनचा वेग मंदावणार, कृषी विभागाचं आवाहन मुंबई, दि. २५: यावर्षी मान्सूनने वेळेआधीच, म्हणजे २५ मे रोजी दक्षिण कोकणात धडक दिली असली तरी, आता त्याच्या प्रवासाची गती मंदावणार आहे. २७ मे पासून राज्यात हवामानात मोठे बदल अपेक्षित असून, कोरडे वातावरण आणि तापमानात वाढ दिसून येईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी, विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांनी, … Read more

मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने राष्ट्रीय महामार्गाची केली दाणादाण

अपूर्ण कामामुळे नागरिक त्रस्त कागल / प्रतिनिधी: यंदा मे महिन्यातच कोसळलेल्या विक्रमी मान्सूनपूर्व पावसाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः दुर्दशा केली आहे. कागलजवळ, विशेषतः दुधगंगा नदीजवळच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, त्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे किरकोळ अपघातही वाढले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर २४ तास वर्दळ असते. दळणवळणाचे … Read more

गोकुळ शिरगावच्या विकासाला ‘ब्रेक’ का ? शाहू महाराज नगर २० वर्षांपासून उपेक्षित!

२० वर्षांची प्रतीक्षा ! गोकुळ शिरगावच्या शाहू महाराज नगरचे दुःख कोण ऐकणार? गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव हे एक प्रगतशील गाव म्हणून ओळखले जाते. परंतु याच गावातील पूर्वेकडील छत्रपती शाहू महाराज नगर गेली २० वर्षे मूलभूत सुविधांच्या अभावामुळे विकासापासून दूर का राहिले आहे, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. येथील मुख्य … Read more

बँकेच्या नवकल्पनांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन मुरगूड (शशी दरेकर) : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळीचा एक भक्कम आधारस्तंभ असलेल्या विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेला यंदा ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. आर्थिक सक्षमीकरणाची गरज ७८ वर्षांपूर्वी ओळखून स्वर्गीय विश्वनाथराव पाटील यांनी या बँकेची स्थापना केली होती. सहकार तत्वावर उभी राहिलेली … Read more

दुधगंगा वेदगंगा साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन

शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, देशाला परकीय चलन बचत! कोल्हापूर, दि. २३ : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात (मौनीनगर) उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडले. फित कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राष्ट्राला समर्पित … Read more

सरपिराजीराव तलावाच्या सांडव्या वरती पुल व्हावा या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुरगूड शहरवासीयांतर्फे निवेदन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. हा कार्यक्रम सपन्न झाल्यानंतर सरपिराजी तलावाच्या सांडव्याच्या पाण्यावर पूल व्हावा या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यानां मुरगूडवाशियातर्फै देण्यात आले. मुरगुड शहराच्या पूर्व बाजूस सर पिराजीराव तलाव हा शंभर वर्ष पूर्ण झालेल्या तलाव … Read more

बनावट जन्म प्रमाणपत्रांना चाप लागणार; ‘एसओपी’ची अंमलबजावणी सुरू

महसूलमंत्र्यांकडून जन्म नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता; रद्द प्रमाणपत्रे परत घेणार अखेर जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एसओपी’ (प्रमाणित कार्य पद्धती) लागू होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंबंधीचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे आता जन्म प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि पारदर्शक होईल अशी अपेक्षा आहे. रद्द झालेली प्रमाणपत्रे परत जमा करण्याची सूचना मंत्रालयात झालेल्या बैठकीत, … Read more

गोकुळ शिरगावजवळ गाय वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात; चालक जखमी

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): गोकुळ शिरगाव येथील साई प्रसाद हॉटेलजवळ पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गायींची वाहतूक करणाऱ्या एका आयशर टेम्पोला अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला असून, वाहनातील काही गायींनाही दुखापत झाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०९ बीसी ०४०३ क्रमांकाचा टेम्पो चालक अभिजित आप्पासो पाटील (वय ३२, … Read more

कागलमध्ये लाखोंचा ऐवज लंपास, चोरट्यांचे पोलिसांसमोर आव्हान

कागल (विशेष प्रतिनिधी): कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील वाकी वसाहतीत एका बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ११ लाख ३१ हजार ४४५ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुनाथ बाळू पाटील यांच्या घरी झालेल्या या चोरीमुळे कागल पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मिळालेल्या … Read more

शिष्यवृत्ती लाभार्थी संख्येत वाढीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. २१: शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या संच संख्येत कोणतीही वाढ किंवा बदल झालेला नाही, त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ पोहोचवण्यासाठी हा बदल आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीत महत्त्वाचे निर्णय मंत्रालयात झालेल्या एका आढावा बैठकीत विविध शिष्यवृत्ती योजना … Read more

error: Content is protected !!