कागलमध्ये वटपौर्णिमा उत्साहात; गजऱ्यांची मागणी वाढली!

कागल : कागल शहर आणि परिसरातील सुवासिनींनी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. वडाच्या झाडाजवळ महिलांची पूजेसाठी गर्दी झाली होती. वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांकडून मोगऱ्याच्या गजऱ्यांना मोठी मागणी होती. पारंपरिक पेहरावात सौंदर्य वाढवण्यासाठी गजऱ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्यांची विक्री लक्षणीय वाढली. मागणी वाढल्याने गजऱ्यांच्या दरातही तीन ते पाच पट वाढ झाली, तरीही ग्राहकांनी मोठ्या उत्साहाने गजरे … Read more

अवकाळीच्या तडाख्याने भाजीपाल्याचे दर भडकले

फळभाज्या ८० ते ९० रुपये किलो कागल (सलीम शेख ) : कागल आठवडी बाजारात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार धक्क्यामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक लक्षणीयरीत्या घटली असून, सलग दुसऱ्या आठवड्यात भाजीपाल्याचे दर तेजीत राहिले आहेत. टोमॅटो वगळता इतर प्रमुख फळभाज्यांचे दर ७० ते ९० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. मे महिन्यात … Read more

मुरगूड येथे शिवभक्त यांच्यातर्फे वृक्षारोपण

परिसरात ५०० झाले लावण्याचा संकल्प मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील शिवभक्त यांच्यातर्फे सलग दुसऱ्या वर्षीही वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला यावेळी मुरगूड येथील पोलिस स्टेशन येथे मुरगूड चे एपीआय शिवाजी करे, मुरगुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार प्रशांत गोजारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवगड अध्यात्मिक संस्था, सरपिराजीराव तलाव … Read more

मुरगूड येथे ठिकठिकाणी सुवासिनींनी केली वटसावित्रीची पूजा

मुरगूड ( शशी दरेकर ) : ज्येष्ठ मासातील पौर्णिमा.हा दिवस वट पौर्णिमा म्हणून ओळखला जातो.या दिवशी सुवासिनी वटवृक्षाची मनोभावे पूजा  करून पतीला आरोग्य दायक दीर्घायुष लाभावे अशी प्रार्थना करतात. पौराणिक संदर्भानुसार सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण पुन्हा मिळावेत म्हणून यमदेवाकडे मागणी केली होती.त्यासाठी वडाच्या झाडाखाली बसून साधना केली होती.प्रसन्न होऊन यम देवांनी सत्यवानाचे प्राण … Read more

महालक्ष्मीनगर, उजळाईवाडी येथे ऑक्सिजन पार्क स्वच्छतेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार

४० पोती प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट गोकुळ शिरगाव (सलीम शेख): करवीर तालुक्यातील उजळाईवाडी येथील महालक्ष्मीनगर मधील रहिवाशांनी नुकतीच एक कौतुकास्पद स्वच्छता मोहीम राबवली. त्यांच्याच पुढाकाराने वृक्षारोपण करून तयार केलेल्या ‘ऑक्सिजन पार्क’मध्ये ही मोहीम राबवण्यात आली, ज्यात तब्बल ४० पोती प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. हा सर्व कचरा नंतर ग्रामपंचायत उजळाईवाडीकडे ट्रॅक्टर-ट्रॉलीतून विल्हेवाटीसाठी सुपूर्द करण्यात आला. या … Read more

पर्यायी रस्ता मिळेपर्यंत शांत बसणार नाही; तामगाव ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : नेर्ली-तामगाव ते उजळाईवाडीला जोडणारा रस्ता बंद केल्यामुळे आणि त्याला कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध करून न दिल्यामुळे तामगावच्या ग्रामस्थांनी काल (रविवार) ग्रामपंचायत कार्यालयात तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत पर्यायी रस्ता मिळत नाही, तोपर्यंत शांत बसायचे नाही, असा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला. या पार्श्वभूमीवर तहसीलदार स्वप्निल रावडे, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, मंडलाधिकारी … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासा: कोल्हापुरात ‘लिंकिंग’शिवाय दर्जेदार खते मिळणार

कोल्हापूर: आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार आणि ‘लिंकिंग’शिवाय कृषी निविष्ठा (खते, बियाणे, कीटकनाशके) मिळाव्यात यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उत्पादक आणि विक्रेत्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खतपुरवठा आढावा बैठकीत ते बोलत होते. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात मंजूर कोट्यानुसार १०० टक्के खतांचा पुरवठा झाला असून, युरिया, डीएपी, एमओपी, संयुक्त खते आणि एसएसपी यांचा मुबलक … Read more

डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील योगदानाला सलाम कोल्हापूर: राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टने सन 2025 साठीचा 39 वा राजर्षी शाहू पुरस्कार पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना प्रदान करण्याची घोषणा केली आहे. कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. डॉ. पटेल यांना चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३९ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३९ दिनांक ९-०६-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

निधन : एम. व्ही. कांबळे

मुरगूड,ता.८ : येथील दलितमित्र एम.व्ही.कांबळे (वय ७९ ) यांचे निधन झाले. ते सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी होत. त्यांच्या मागे,पत्नी, मुले,सूना,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.९) आहे.

error: Content is protected !!