‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार मुंबई : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. या उपक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा … Read more

कागलच्या बुद्धिबळपटूंना मिळाली संधी : तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न

कागल : कागल तालुकास्तरीय शासकीय बुद्धिबळ स्पर्धा २०२५-२६ नुकतीच ए. डी. माने इंटरनॅशनल स्कूल, कागल येथे पार पडली. सोमवार, २५ ऑगस्ट ते मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ या दोन दिवसांच्या कालावधीत आयोजित या स्पर्धेत तालुक्यातील २२५ हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपली बुद्धिमत्ता व कौशल्ये सादर केली. स्पर्धेचे उद्घाटन कागल पंचायत समितीच्या गट शिक्षण … Read more

विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्रभावी होणार

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रवर्गातील घटकांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळवून देण्यासाठी नवीन कार्यपद्धतीला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे या भटक्या जीवनशैलीतील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे पोहोचणार आहेत. या नव्या कार्यपद्धतीत … Read more

मुरगूडच्या गणेश नागरी पतसंस्थेकडे ११६ कोटी ४ लाख ठेवी – सभापती सोमनाथ यरनाळकर

३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न मुरगुड ( शशी दरेकर ) : श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मुरगूड ता.कागल या संस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती सोमनाथ यरनाळकर होते. प्रथम श्रीगणेश प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलनानंतर श्रध्दांजली वाचन झाले. संस्थापक चेअरमन उदयकुमार शहा यांनी स्वागत केले. … Read more

उजळाईवाडीजवळ अपघात : कारचे चाक निखळल्याने मोठा अनर्थ टळला

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : उजळाईवाडी येथे अथायु हॉस्पिटलसमोर एका चारचाकी वाहनाचा अपघात झाला आहे. गाडीचा पुढील एक्सेल रोड तुटल्याने चाक निखळले आणि गाडी बाजूच्या गटारीला धडकली. मात्र, चालकाने सीट बेल्ट लावल्यामुळे त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार,ही गाडी क्रमांक एम. एच.०४ जे .बी.६८६८ ही तावडे हॉटेल वरून कागलच्या दिशेने जात होती . हा … Read more

एकोंडी मधील फार्म हाऊसवर पोलिसांचा छापा; रंगेल पार्टीचा पर्दाफाश

4 महिलांसह 8 जणांवर गुन्हा दाखल कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील एकोंडी येथील एका फार्म हाऊसवर कागल पोलिसांनी रात्री उशिरा छापा मारला ,.येथे चाललेल्या रंगेल पार्टीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी चार महिलांसह ,आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये कागल, हुपरी, कोल्हापूर येथील महिलांचा समावेश आहे.         कागल पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून सार्वजनिक … Read more

गोरंबे गावात गणेशोत्सव २०२५ ‘डॉल्बीमुक्त’ आणि ‘पर्यावरणपूरक’ साजरा होणार

कागल : कागल पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गोरंबे गावामध्ये यंदाचा गणेशोत्सव ‘डॉल्बीमुक्त’ आणि ‘पर्यावरणपूरक’ साजरा करण्याचा निर्णय सर्व गणेश मंडळांनी घेतला आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्हा पोलीस आणि कगळ पोलीस ठाणे यांनी गोरंबे गावाचे विशेष अभिनंदन केले आहे. गेल्या वर्षी गावात डॉल्बी लावल्याबद्दल १५ गणेश मंडळांवर ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी खटले दाखल करण्यात आले होते. याची दखल … Read more

राहुल भैय्यांनी चूक केली असे वाटू देणार नाही, कोल्हापुरात अजितदादांचा शब्द

विलासरावांनी जशी पी.एन. पाटलांना साथ दिली.. आता मी राहुल पाटलांच्या पाठीशी उभा राहीन – अजित पवार कोल्हापूर, 25 ऑगस्ट 2025 : आज कोल्हापुरात राहुल पाटील, राजेश पाटील, शिवाजीराव पाटील, तेजस्विनी राहुल पाटील, बाळासाहेब खाडे, पीएच पाटील, भारत पाटील, शिवाजी करंडे, संदीप पाटील, शंकरराव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, माजी नगरसेवक व भोगावती साखर कारखान्याचे संचालक … Read more

जिल्हा प्रशासन, पाटबंधारे विभागाकडून जलव्यवस्थापनातील नवा एसओपी

कोल्हापूर : महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि कृषिप्रधान कोल्हापूर जिल्हा, नेहमीच नैसर्गिक आपत्तींना, विशेषतः पुराला, तोंड देत आला आहे. दरवर्षी पावसाळ्यात, पंचगंगा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे जिल्ह्याच्या अनेक भागांना पुराचा धोका निर्माण होतो. परंतु, या वर्षी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने पूर्वनियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्व संबंधित विभागांमध्ये उत्कृष्ट समन्वय साधून पूरस्थिती प्रभावीपणे टाळली. या … Read more

सिंगल युज प्लॅस्टिकला पूर्णपणे ‘टाटा बाय बाय’, शासकीय कार्यालयांमध्येही प्लॅस्टिक बाटल्यांवर बंदी!

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘100 दिवसात प्लॅस्टिक दूर.. नक्की करणार आमचं कोल्हापूर’ अभियानाचा शुभारंभ कोल्हापूर: पर्यावरणाचे रक्षण आणि नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे थांबवा, तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या टाळा, असे महत्त्वपूर्ण निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘100 दिवसांत प्लॅस्टिक दूर.. नक्की … Read more

error: Content is protected !!