नदीतील पाणी उपसा बंदीविरोधात शेतकरी आक्रमक

सिंचन भवन कार्यालयासमोर आंदोलन!

कोल्हापुर (प्रतिनिधी) : नदीतील पाणी उपसा करण्यावर प्रशासनाने घातलेल्या बंदीविरोधात शेतकरी आता पूर्णपणे आक्रमक झाले आहेत. या बंदीच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत सिंचन भवन कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले.

Advertisements

शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी

आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला. “शेतकरी एकजुटीचा विजय असो”, “उपसा बंदी तातडीने रद्द झालीच पाहिजे”, अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी संपूर्ण सिंचन भवन परिसर दणाणून सोडला. व्हिडिओमध्ये शेतकरी कार्यालयाच्या आत आणि बाहेर मोठ्या संख्येने एकत्र येऊन आपला संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

Advertisements
  • Please, check code will be mailed to the Amazon registered email ID within 2 hours of ordering, or check ‘Buyer/Seller m…
  • Cash on delivery is not available and this item is non-returnable. This software works on devices with India IP addresse…
  • SIA – your Security Assistant for a simpler, stress-free experience. Provides Instant Answers, Feature Walkthroughs, Pro…
₹2,292

शेतकऱ्यांच्या मते, नदीतील पाणी उपसा करण्यावर बंदी घातल्यामुळे त्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. आधीच शेती संकटात असताना प्रशासनाचा हा नवा नियम शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा ठरेल. त्यामुळे ही ‘पाणी उपसा बंदी’ तातडीने मागे घेण्यात यावी, अशी एकमुखी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. “प्रशासनाने आमची मागणी मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करू,” असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

Leave a Comment

error: Content is protected !!