मुरगूड ( शशी दरेकर ) : आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्व कोणीही नाकारू शकत नाही . स्वच्छ परिसर , स्वच्छ हवा , पाणी , वातावरण कोणाला नकोसे असते . स्वच्छतेने रोगराई नाहीसे होते. अशा चांगल्या सवयीचा सर्वांच्या जीवनावर खूप परिणाम होतो.

Advertisements

माझा भारत, स्वच्छ भारत हा संदेश प्रत्येक नागरीकांपर्यंत पोहचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर शालेय विद्यार्थ्यानीं शैक्षणिक सहलीमध्ये स्वच्छता मोहिम राबविली .
विद्यामंदिर सोनगे ता . कागल या शाळेची शैक्षणिक सहल महाबळेश्वर , प्रतापगड व रायगड येथे गेली होती .सहलीमध्ये इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यानीं सहभाग घेतला होता .

Advertisements

अनेकजण फोटोसाठी , सेल्पी काढण्यासाठी , मौजमजा करण्यासाठी रायगड किल्ल्यावर येतात . पण , सोनगे येथिल विद्यामंदिर या शाळेच्या विद्यार्थ्यानी रायगड किल्यावर पडलेल्या पाण्याचा बाटल्या, खाऊचे पाऊच, प्लॅस्टिक पिशव्या, तुटलेल्या चपला व पडलेला कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावून ऐतिहासिक रायगड किल्याची सहलीचा आनंद घेत स्वच्छता करुन एक वेगळाच आदर्श तरुणांच्या समोर ठेवला आहे . सोनगे शाळेच्या चिमुकल्यानीं राबवलेल्या या स्वच्छता उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे .

Advertisements

या विद्यार्थ्यानां पर्यावरणप्रेमी शिक्षक श्री . हरिश्चंद्र साळोखे , भाऊ कुंभार , संदिप शिंदे , के.व्ही. पाटील , सौ . सुनिता पाटील , या शिक्षकांचे मार्गदर्शन तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . मंगल भोई , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष , उपाध्यक्ष , सर्व सदस्य यांचे प्रोत्साहन लाभले.

पर्यावरण शिक्षक श्री . हरिश्चन्द्र साळोखे हे चारपाच वर्षातून एकदा रायगड सहलीचे आयोजन करुन रायगड स्वच्छता मोहिम राबवितात . त्याचबरोबर पर्यावरणपूरक गणेशोत्सव , प्लॅस्टिक कॅरीबॅग बंदीच्या अगोदर २०१२पासून कापडी पिशव्या मोफत वाटप करतात . आतापर्यंत त्यानीं दहा हजारापेक्षा जास्त पर्यावरण संदेश छापलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप केले आहे .

AD1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!