समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा खुला; आता शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात आले. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे १६ तासांचे अंतर आता अवघ्या ८ तासांत कापता येणार आहे. या प्रसंगी बोलताना, समृद्धी महामार्गाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त करत, आता शक्तिपीठ महामार्गाचे काम लवकरच सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री … Read more

Advertisements

शेतकऱ्यांनो, परदेशातील शेती तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्या!

आता महिला शेतकरीही परदेशात जाऊन शिकणार! कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत ‘देशाबाहेरील अभ्यासदौरे’ ही योजना राबवली जात आहे. पुणे कृषी आयुक्तालयाच्या तंत्र अधिकाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे. यावर्षी, म्हणजेच सन 2025-26 मध्ये महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, … Read more

मंत्रालयात सामान्यांची धास्ती का? सामान्य नागरिकांचा मंत्रालयातील प्रवेशासाठी संघर्ष!

मुंबई: राज्याचे मंत्रालय, जे सामान्य जनता, गरीब, कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांच्या सेवेसाठी उभारले गेले आहे, त्याचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. कामांसाठी शेकडो किलोमीटर दूरवरून येणाऱ्या सामान्य माणसांना मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ओळखपत्र दाखवून, तासन् तास रांगेत उभे राहून आणि अनेक तपासण्या पार करून मंत्रालयात प्रवेश मिळतो. यामुळे मंत्रालयात येणाऱ्या … Read more

पाण्याअभावी पिके करपू लागली

कागल (विक्रांत कोरे) : उन्हाचा तडाखा वाढला आहे. रखरखत्या उन्हाने शेतकरी कासावीस झाला आहे .शेती- शिवारात पाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्यातच अधून – मधून वीज मंडळ अनेक कारणे सांगत शेतकऱ्यांना शॉक देत आहे. त्यामुळे शेती शिवारातील पिके करपू लागली आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतो आहे. मे महिना म्हणजे रखरखते ऊन. या रखरखत्या उन्हात चिटपाखरू … Read more

मुरगूडच्या हुतात्मा तुकाराम चौकात गुरुवारी राजू शेट्टी यांची जाहीर सभा

सभेत कारखानदाराशी झालेल्या चर्चेचे पडसाद उमटण्याची शक्यता मुरगूड ( शशी दरेकर ) – “स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची सभा मुरगुड ता. कागल येथे गुरुवार दिनांक 16 रोजी सायंकाळी 5 वा हुतात्मा तुकाराम चौक येथे होणार आहे.ऊस दराचे आंदोलन सध्या पेटलेले असून गेल्या काही दिवसात झालेल्या घडामोडींबाबत भाष्य करण्यासाठी आणि लोकभूमिका तयार करण्यासाठी या … Read more

error: Content is protected !!