मुरगूडमध्ये प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धेत सानिका स्पोर्टस् प्रथम तर तुकाराम चौक बारामती द्वितीय

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील सानिका FC स्पोर्टस् फौंडेशनच्या वतीने मुरगूडमध्ये प्रकाशझोतात आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात येथील सानिका स्पोर्ट्सने तुकाराम चौक बारामती संघाचा सात धावांनी पराभव करीत रोख ७५,६९९च्या रोख बक्षीसासह प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला. प्रथम क्रमांकासाठी सानिका स्पोर्टस् मुरगूड व तुकाराम चौक बारामती यांच्यात चुरशीचा सामना झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या … Read more

सर पिराजीराव शिक्षक पतपेढी राज्यात अग्रेसर: संजयबाबा घाटगे

शेंडूर येथे मोबाईल ऍप शुभारंभ व विविध पुरस्कारांचे वितरण व्हनाळी(सागर लोहार) : सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक सह पतपेढी कागल या संस्थेने शिक्षकांची पत वाढवत राज्यातील अग्रगण्य पतसंस्था असा नावलौकीक संपादन केला आहे. नेहमीच पारदर्शी काराभारास सर्वोच्च प्राधान्य देत या संस्थेने सहकारात आदर्श निर्माण केला असून वेतन आयोग लागू करणारी हि एकमेव शिक्षक पतसंस्था असल्याचे प्रतिपादन … Read more

समान नागरी कायद्यासाठी आरक्षण संपवण्याचा भाजपाचा डाव:  नाना पटोले

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका नको   मुंबई : देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आरक्षण संपवण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव असून त्याची सुरुवात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपवण्यापासून होत आहे. परंतु ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घेऊ नयेत अशीच काँग्रेस पक्षाची तसेच महाविकास आघाडीची भूमिका आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस … Read more

शिक्षक पर्यवेक्षक काम ज्या-त्या कनिष्ठ महाविद्यालयातच व्हावे

शिक्षक संघटनेची कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी कागल(विक्रांत कोरे): बारावीच्या परीक्षांना प्रारंभ होत असताना पर्यवेक्षणाच्या पद्धतीत बदल करून शिक्षकांची मुस्कटदाबी केली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या मध्ये असंतोष पसरला आहे. त्यात तात्काळ बदल करावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बारावी विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाईन पद्धतीने सुरू होता. त्यामुळे भयमुक्त व … Read more

अन्नपुर्णा शुगर च्या गळीत हंगामाची यशस्वी सांगता..!

दिड लाख मेट्रीकटन ऊस गाळप; वेळेत ऊस तोडीने शेतकरी समाधानी व्हनाळी (सागर लोहार) : केनवडे ता. कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाची यशस्वी सांगता झाली. यंदा कारखान्याने दिड लाख मेट्रीक टन ऊस गाळप केले असून बैलगाडी चालकांनी मोठ्या उत्सहात वाजत गाजत मिरवणूकीने ऊसाच्या अंतीम फे-या कारखान्याकडे पोहच केल्या. … Read more

बेलवळे येथे महाशिवरात्री निमित्त अभिषेक व शिवलिलामृत ग्रंथाचे मोफत वाटप 

व्हनाळी (सागर लोहार) : महाशिवरात्री निमित्त बेलवळे  खुर्द व बस्तवडे तालुका कागल येथील महादेव मंदिरात शिवसेना तालुकाप्रमुख अशोकराव पाटील बेलवळेकर यांनी अभिषेक घालून शिवभक्तांना बेलाचे रोप ,रुद्राक्ष माळ भस्मखडा व  शिवलीलामृत ग्रंथाचे मोफत वाटप केले. महाशिवरात्रीचा प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की, या दिवशी शिव तत्व आपल्या भौतिक प्राप्तीसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पृथ्वीवर अवतरीत होते. म्हणून … Read more

संजय घाटगे यांचा बेमुदत धरणे आंदोलनास जाहीर पाठिंबा

व्हनाळी : वार्ताहरशेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा दहा तास वीजपुरवठा करावा या मागणीसाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ताराबाई पार्क कोल्हापूर  येथील महावितरणच्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित  राहून आंदोलनास आपला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना संजय घाटगे म्हणाले, शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा … Read more

उत्पादनवाढीसाठी  शेतकऱ्यांना शाहूतर्फे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार – राजे समरजितसिंह घाटगे

बामणी येथे ड्रोन तंत्राद्वारे फवारणी प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा प्रतिसाद  व्हनाळी:  सागर लोहार  ऊसाच्या उत्पादनवाढीसाठी  शेतकऱ्यांना शाहू कारखान्यामार्फत आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे.असे प्रतिपादन  शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.   बामणी  ता.कागल येथे शाहू साखर कारखान्यामार्फत ज्ञानदेव तारदाळे  यांच्या ऊस पिकावर ड्रोन तंत्राद्वारे औषध फवारणीच्या प्रात्यक्षिकवेळी ते बोलत होते.या प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी … Read more

करनूर येथील दीड वर्षाच्या शिवतेजच्या हस्ते ज्यूस घेवुन संभाजीराजेनी सोडले उपोषण

कागल( विक्रांत कोरे ) : मराठा आरक्षणासाठी व इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे 26 फेब्रुवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले होते. त्यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर ,त्यांनी करनूर तालुका कागल येथील गिर्यारोहक शिलेदार अॅडव्हेंचर संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष सागर नलवडे यांचा मुलगा कु. शिवतेज सागर नलवडे याच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडले. सलग तीन दिवस … Read more

केडीसीसी बँकेत १६ मृत शेतकर्‍यांच्या वारसांना विमा धनादेशांचे वाटप

अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ३२ लाखांच्या धनादेशाचे वाटप कोल्हापूर : मृत शेतकऱ्यांच्या वारसदारांना केडीसीसी बँकेत विमा रक्कमेच्या धनादेशांचे वाटप झाले. बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संचालक मंडळाच्या बैठकीत हे वितरण झाले. याबाबत अधिक माहिती अशी, बँकेने किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत स्वभांडवलामधून अडीच लाख शेतकऱ्यांचा प्रत्येकी दोन लाख … Read more

error: Content is protected !!