‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड आज ! नविद मुश्रीफ यांच्या नावाची जोरदार चर्चा

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आज (शुक्रवार, ३० मे रोजी) संचालक मंडळाची सभा होणार असून, या सभेत नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीला वेग आला आहे. गेले काही दिवस ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले … Read more

‘ऑगस्ट’चं धान्य ‘जून’मध्येच! लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

पावसाळ्यापूर्वी घ्या ऑगस्ट २०२५ पर्यंतचं धान्य: शासनाचं आवाहन मुंबई, दि. २९: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत मोफत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी टाळण्यासाठी, केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की, ऑगस्ट २०२५ पर्यंतचं अन्नधान्य आता ३० जून २०२५ पर्यंतच रास्तभाव दुकानांमधून … Read more

अवकाळी पावसाचा तडाखा: कोल्हापूर जिल्ह्यात तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

कोल्हापूर : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने शेती, फळपिके, घरे आणि गोठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. आज झालेल्या एका तातडीच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित या बैठकीत जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी … Read more

येस बँकेच्या ATM मध्ये ₹4500 च्या बनावट नोटा जमा; कागलमध्ये खळबळ

कागल (विक्रांत कोरे): येस बँकेच्या एटीएम मध्ये मशीनद्वारे रुपये 11500 भरणा करण्यात आला होता. यामध्ये रुपये पाचशेच्या नऊ नोटा बनावट निघाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. ही घटना तारीख 15 मे रोजी येस बँक शाखा  रिंग रोड, सागर बेकरी जवळ कागल येथे घडली.             मनोज कुमार पाच्छापुरे राहणार महावीर नगर हुपरी यांनी तारीख २५ मे रोजी … Read more

कागल तालुक्यास अतिवृष्टीचा फटका बसला आहे नऊ घरांची पडझड व शेतीच्या पिकांचे अतोनात नुकसान

कागल/प्रतिनिधी : अतिवृष्टीचा फटका बसल्याने कागल तालुक्यात नऊ घरांची पडझड होऊन दोन लाख 17 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून तलाठी यांनी पंचनामे करून कागल तहसीलदार कार्यालयाकडे अहवाल सादर केले आहेत.              नुकसान झाल्याची नावे अशी, अनुक्रमे मुंगळी तालुका कागल येथील सागर काकासो कांबळे यांच्या घराची पडझड झाली आहे. अंदाजे नुकसान … Read more

गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यासमोर झाड कोसळले

वाहतूक विस्कळीत, कोणतीही हानी नाही गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : आज दिवसभर कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यासमोर असलेले एक मोठे जीर्ण झाड रस्त्यावर कोसळले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच, औद्योगिक वसाहत कामगारनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था केली. … Read more

कागल येथील अशोका हॉटेलसमोरील बोगदा वाहतूक कोंडीचे केंद्र

नागरिक संतप्त, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी कागल (सलीम शेख ) : कागल शहरातील अशोका हॉटेलसमोरील बोगदा (Underpass) सध्या वाहनचालकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाळ्यात या बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक वाहने बंद पडतात, ज्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. याशिवाय, संध्याकाळच्या वेळी येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले … Read more

सुळकूड येथे दुधगंगा नदीच्या जुन्या पुलावर पाणी; वाहतूक नवीन पुलामुळे सुरळीत

सुळकूड: गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुधगंगा नदीची पाणी पातळी वाढली असून, अनेक पुलांवर पाणी आल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे. आता सुळकूड येथील जुन्या पुलावरही लवकरच पाणी येण्याची शक्यता आहे. मात्र, सुदैवाने येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे वाहतूक सुरळीत सुरू राहणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली … Read more

‘नीरज चोप्रा’ पुस्तकासाठी संजय दुधाणेंना मसाप ग्रंथ पुरस्कार

पुणे: ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘नीरज चोप्रा’ या पुस्तकासाठी लेखक संजय दुधाणे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा (मसाप) प्रतिष्ठेचा ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १२० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला. दिल्लीच्या सुप्रसिद्ध … Read more

कागल तालुका बाजार समितीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही: मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कागल येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होणार नाही, असा कोणताही निर्णय राज्य शासनाने घेतलेला नाही, अशी माहिती राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. त्यामुळे या संदर्भात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आता कागल येथे आपला उपबाजार (sub-market) सुरू करणार आहे. यासाठी बाजार … Read more

error: Content is protected !!