व्हनाळी (वार्ताहर) – केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा भैरवनाथ ग्रामिण बिगर शेती सहकारी पत संस्थेला चालू वर्षी 25 लाख निव्वळ नफा झाला असल्याची माहिती चेअरमन साताप्पा तांबेकर यांनी दिली. संस्थापक मा.आम.संजयबाबा घाटगे म्हणाले, पारदर्शी कारभार व कर्मचा-यांच्या योग्य नियोजनामुळे ही संस्था अल्पावधीतच नावारूपाला आली आहे त्याबद्दल चेअरमन,व्हा.चेअरमन संचालक मंडळ, कर्मचारी, सभासद शेतक-यांचे आभार व्यक्त केले.

Advertisements

यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन कै.आनंदा बाबू तळेकर यांचे निधन झाल्याने या रिक्त जागेवर विष्णूपंत गायकवाड यांची नुतन व्हा.चेअरमन म्हणून निवड करण्यात आली.
सचिव तानाजी कांबळे यांनी संस्थेच्या आवाहल वाचन केले. यावेळी संचालक शामराव पोवार,बाजीराव पाटील,धोंडिराम एकशिंगे,आनंदा खंडागळे,संजय चिंदगे,आनंदा दादू तळेकर,दतात्रय दंडवते,सुहास रोडे,आकाराम बचाटे,आदी उपस्थीत होते. स्वागत सौ.पुनम चव्हाण यांनी केले. आभार प्रविण वासकर यांनी मानले.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!