रयत विकास सेवा संस्थेचे माजी कर्मचारी पांडूरंग साळोखे यांचे निधन

मुरगूड ता. कागल येथील रयत विकास सेवा संस्थेचे माजी कर्मचारी पांडूरंग धोंडीबा साळोखे (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. उत्तरकार्य मंगळवार दि .२२ / ४ / २०२५ रोजी आहे.

“पंचतारांकित तीर्थक्षेत्र व भिकार शाळा” ही धोक्याची शेवटची घंटा – डॉ. अर्जुन कुंभार

समाजवादी प्रबोधिनी मुरगुडच्या डॉ. आंबेडकर व्याख्यानमालेचा समारोप मुरगूड ( शशी दरेकर ) : “तीर्थक्षेत्र पंचतारांकित आणि प्राथमिक शाळा भिकार” अशी अवस्था समाजाचे अधःपतन  होत आहे हा इशारा देणारी शेवटची घंटा असते. परिस्थिती भयावह होण्यापूर्वी मानवी जीवन वाचवण्यासाठी शिक्षण व्यवस्था वाचली तर माणूस वाचेल माणूस वाचला तर समाज वाचेल आणि समाज वाचला तर देश आणि जग … Read more

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, शुक्रवारी पुण्यात समारंभ

शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव, सचिन खिलारी, आदिती स्वामी, ओजस देवतळे यांना थेट पुरस्कार मुंबई  : सन 2023-24 च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात केली. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव तर पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागितिक विजेते आर्चर आदिती स्वामी,ओजस देवतळे , … Read more

कागलमध्ये राजकीय भूकंप: संजयबाबा घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश

व्हनाळी: शिवसेना ठाकरे गटाचे कागल येथील माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि त्यांचे पुत्र गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनी आज मुंबईत भारतीय जनता पार्टीत शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे कागलच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. संजयबाबा घाटगे यांच्या भाजप … Read more

माद्याळ मध्ये गांजा जप्त, एकाला अटक

मुरगुड (शशी दरेकर): कोल्हापूर जिल्ह्यातील माद्याळ येथे पोलिसांनी एका शेतात छापा टाकून २ लाख १९ हजार ५७० रुपये किमतीचा २१ किलो ९५७ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिनकर कृष्णा राणे (वय ७५) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:४० वाजता माद्याळ गावाच्या हद्दीत कोंडार नावाच्या शेतात … Read more

आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्यु. कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) :  सौ.आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष के.डी. पाटील सरांनी ज्योत प्रज्वलित करून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन करून केली. यानंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रकाश टाकण्यात आला, ज्यामुळे सगळ्यांना त्यांच्या कार्याची आणि … Read more

सर्व जाती धर्माच्या शोषितानी रस्त्यावर उतरल्याशिवाय सामाजिक, आर्थिक समता प्रस्थापित होणे शक्य नाही – प्रा. डॉ. अच्यूत माने

मुरगूड (शशी दरेकर) : शोषणाला जात असते का असा सवाल उपस्थित करत सर्व जाती धर्माच्या शोषितांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित होणे शक्य नाही असा इशारा जेष्ठ विचारवंत सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ.अच्चूत माने यांनी दिला. समाजवादी प्रबोधिनी मुरगूड शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत  प्रमुख वक्ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुरगुडचे माजी … Read more

कागलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे यांनी केले होते आयोजन कागल : वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कागल शहरातील गोपाळकृष्ण गोखले भाग शाळा, जयसिंगराव पार्क येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विविध आजारांची … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३१ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३१ दिनांक १४-०४-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

राजर्षी शाहूरायांनी ज्ञानाची मत्तेदारी मोडून काढली

बहुजन समाजाच्या उद्धाराचे कंकण हाती बांधणारे सामाजिक क्रांतीची प्रेणेते महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत सर्व समाज सुधारकांनी शिक्षण ही सुधारणांची ‘किल्ली’ मानली होती. शिक्षण म्हणजे विद्या, ज्ञान तिच्यापासून शेकडो वर्ष बहुजन समाज वंचित राहिला. त्यामुळे दारिद्र्य आणि अज्ञान या गर्तेत अडकून पडला. … Read more

error: Content is protected !!