कागल तालुका बाजार समितीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही: मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कागल येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होणार नाही, असा कोणताही निर्णय राज्य शासनाने घेतलेला नाही, अशी माहिती राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. त्यामुळे या संदर्भात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आता कागल येथे आपला उपबाजार (sub-market) सुरू करणार आहे. यासाठी बाजार … Read more

११ वी प्रवेश प्रक्रिया: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

मुंबई : इयत्ता ११ वी (FYJC) प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ अंतर्गत २६ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन नोंदणी पोर्टल सुरू झाले आहे. या पोर्टलद्वारे पहिल्याच दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना ही प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण करता यावी … Read more

बाचणीत मध्यरात्री मोठी चोरी: तीन ज्वेलर्स दुकाने, बार आणि घराला लक्ष्य, चोरटे सीसीटीव्हीत कैद

बाचणी (तानाजी सोनाळकर) : रविवारी मध्यरात्री बाचणी गावातील भर वस्तीत चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ज्वेलर्सची दुकाने, एक बार आणि एक घर लक्ष्य केले. या मोठ्या चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, कागल पोलीस पुढील तपास करत आहेत. चोरीचा तपशील रविवारी रात्री, गावकरी गाढ झोपेत असताना, चोरट्यांनी एकाच रात्रीत … Read more

बाचणी येथे दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर

कोल्हापुर बाचणी मार्ग बंद बाचणी (तानाजी सोनाळकर) : दूधगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बाचणी-कोल्हापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे व्हणाली, साके, बेळवले खुर्द येथील वाहतूक ठप्प झाली असून, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. मे महिन्यातच दूधगंगा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा झाली आहे, तसेच पेरणी हंगामातच नदीला पूर आल्याने शेतकरी हवालदिल झाले … Read more

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको !

मान्सूनचा वेग मंदावणार, कृषी विभागाचं आवाहन मुंबई, दि. २५: यावर्षी मान्सूनने वेळेआधीच, म्हणजे २५ मे रोजी दक्षिण कोकणात धडक दिली असली तरी, आता त्याच्या प्रवासाची गती मंदावणार आहे. २७ मे पासून राज्यात हवामानात मोठे बदल अपेक्षित असून, कोरडे वातावरण आणि तापमानात वाढ दिसून येईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी, विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांनी, … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३७ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३७ दिनांक २६-०५-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने राष्ट्रीय महामार्गाची केली दाणादाण

अपूर्ण कामामुळे नागरिक त्रस्त कागल / प्रतिनिधी: यंदा मे महिन्यातच कोसळलेल्या विक्रमी मान्सूनपूर्व पावसाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः दुर्दशा केली आहे. कागलजवळ, विशेषतः दुधगंगा नदीजवळच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, त्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे किरकोळ अपघातही वाढले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर २४ तास वर्दळ असते. दळणवळणाचे … Read more

गोकुळ शिरगावच्या विकासाला ‘ब्रेक’ का ? शाहू महाराज नगर २० वर्षांपासून उपेक्षित!

२० वर्षांची प्रतीक्षा ! गोकुळ शिरगावच्या शाहू महाराज नगरचे दुःख कोण ऐकणार? गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव हे एक प्रगतशील गाव म्हणून ओळखले जाते. परंतु याच गावातील पूर्वेकडील छत्रपती शाहू महाराज नगर गेली २० वर्षे मूलभूत सुविधांच्या अभावामुळे विकासापासून दूर का राहिले आहे, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. येथील मुख्य … Read more

मामाचं गाव हरवलं…

      गुडी पाडव्याच्या सणापासून सुरू झालेल्या आंब्याच्या मोसमात वार्षिक परीक्षाचाही माहोल असायचा. कशीबशी वार्षिक परीक्षा ड्रॉईंग म्हणजेच चित्रकलेचा शेवटचा पेपर मास्तरांच्या हातात टेकवून घरी धुम ठोकली जायची. घरी बॅगा भरलेल्या असायच्या, कसेतरी पोटोबा-विठोबा करायचे आणि मामाच्या गावाला लवाजमा निघायचा.         साल १९८०-९० या दशकात जरा हटके होऊन वळून पाहिले की, “झुक झुक, झुक झुक आगीणगाडी,पळती झाडे पाहूया, … Read more

बँकेच्या नवकल्पनांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन मुरगूड (शशी दरेकर) : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळीचा एक भक्कम आधारस्तंभ असलेल्या विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेला यंदा ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. आर्थिक सक्षमीकरणाची गरज ७८ वर्षांपूर्वी ओळखून स्वर्गीय विश्वनाथराव पाटील यांनी या बँकेची स्थापना केली होती. सहकार तत्वावर उभी राहिलेली … Read more

error: Content is protected !!