शासनाच्या कृषी पुरस्कारासाठी 30 जून पर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर, दि. 22 : महाराष्‍ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन 2022 या वर्षामध्‍ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्‍या व्यक्ती, गट, संस्थांनी विविध कृषी पुरस्कारांसाठी आपल्‍या जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दिनांक ३० जून २०२३ पर्यंत प्रस्ताव करण्याचे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्‍हाण यांनी केले आहे.

Advertisements

कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणा-या शेतक-यांचा तसेच कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणा-या व्यक्ती, संस्था, गट यांना  डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण, सेंद्रीय शेती कृषीभूषण, उद्यानपंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, युवा शेतकरी पुरस्कार व कृषी विभागामध्ये  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.

Advertisements

राज्यातील जास्‍तीत जास्‍त शेतकरी, गट, संस्था, व्यक्ती  यांनी विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव सादर करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी कळविले आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!