कोल्हापूर, 6 जून: छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील एक महत्त्वाचा अध्याय, शिवराज्याभिषेक दिन, आज कोल्हापुरात कागलकर वाड्याच्या प्रांगणात अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने शिवशक राजदंड स्वराज्यगुढीची स्थापना करण्यात आली, जी शिवरायांच्या सार्वभौमत्वाची आणि रयतेच्या कल्याणाची प्रतीक आहे.

Advertisements

सनई आणि पोवाड्यांच्या निनादात पार पडलेल्या या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण म्हणजे शाहीर रंगराव पाटील यांनी सादर केलेले शिवरायांच्या जीवनपटावरील जिवंत देखावे. अफजलखानाचा वध, पन्हाळगड वेढा, आग्र्यातून सुटका आणि राज्याभिषेक सोहळा यांसारख्या प्रसंगांनी उपस्थितांना खिळवून ठेवले. एका तासाच्या या सादरीकरणातून शिवरायांचे शौर्य, दूरदृष्टी आणि न्यायप्रियता पुन्हा एकदा अनुभवता आली.

Advertisements

यावेळी आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा केवळ एका ऐतिहासिक घटनेचे स्मरण न राहता, शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या ‘प्रजा सुखी तरंच राजा सुखी’ या लोककल्याणकारी संकल्पनेचा उत्सव ठरला. शिवरायांनी रयतेच्या झोळीत सुख, समृद्धी आणि स्वातंत्र्य कसे भरले, याचा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

Advertisements
AD1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!