श्रावण षष्ठी यात्रेनिमित्त वाहतूक नियमनासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा

कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा (वाडी-रत्नागिरी) येथे ३० जुलै ते ३१ जुलै २०२५ दरम्यान होणाऱ्या चोपडाई देवीच्या श्रावण षष्ठी यात्रेनिमित्त वाहतूक नियमनासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. वाहतूक बदल आणि प्रवेश बंदी : एकेरी वाहतूक मार्ग : नो … Read more

गोकुळ शिरगावजवळ सर्विस रोडवर ट्रक पलटी; कोणतीही जीवितहानी नाही

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : राष्ट्रीय महामार्गावर कागलहून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या आले वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला आज गोकुळ शिरगाव येथील जैन मंदिरासमोर अपघात झाला. राष्ट्रीय महामार्गावरून बाजूला घेत असताना अचानक ट्रक घसरून पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, किरकोळ नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक आल्ले घेऊन जात होता. गोकुळ … Read more

राजे विक्रमसिंह घाटगे हे शाहूराजांच्या रक्ताबरोबर विचाराचे व कर्तुत्वाचे खरे वारसदार – व्ही. जी. पोवार

विक्रमसिंह घाटगे हे छत्रपती शाहू महाराज यांच्या केवळ रक्ताचेच नव्हे तर कर्तुत्वाचे व विचाराचे खरे वारसदार असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार यांनी केले.      व्हन्नूर ता.कागल येथील श्री.दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयात राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंती निमित्तच्या समारंभात ते बोलत होते.         श्री पोवार यांनी राजे विक्रमसिंह घाटगे यांनी बहुजन मुलांच्या शिक्षणासाठी राजेंनी राबवलेले विविध उपक्रम,साखर … Read more

पत्रकारितेच्या माध्यमातून प्रबोधनाची गरज – प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे

मुरगूड ( शशी दरेकर ) – आजचे दाहक सामाजिक वास्तव पाहता लोकांमध्ये सामाजिक भान आणण्यासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी केले. ते “ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद” अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी कोर्सचे समन्वयक प्रा. सुशांत … Read more

महाराष्ट्रात मंत्रिमंडळात भूकंप ?

जनमताचा रेटा अन् वादग्रस्त मंत्र्यांवर गाजणार गाज मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मंत्रिमंडळ विस्तारापेक्षाही खातेबदलाची चर्चा अधिक जोर धरत आहे. जनतेचा वाढता असंतोष आणि काही मंत्र्यांच्या सततच्या वादग्रस्त विधानांमुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी सत्ताधारी पक्ष आता खात्यांमध्ये मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाजाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या खातेबदलांबाबत … Read more

अंतराळ संशोधनातील शोधकता जोपासावी – प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) – अंतराळ संशोधनात नवनव्या संधी उपलब्ध होत असून त्याचा फायदा विद्यार्थी व तरुणांनी घ्यावा. तसेच अंतराळ संशोधनातील उच्चतम शोधकता जोपासावी. असे आवाहन प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी केले. ते गगनबावड्यातील पद्मश्री डॉ. ग .गो. जाधव महाविद्यालयात भौतिक शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या *सुभांशू शुक्ला एक अंतराळ सफर* या भितीपत्रकाच्या … Read more

‘गोकुळ’ची दूध उत्पादकांना मोठी भेट

म्हैस खरेदीसाठी आता 50,000 अनुदान! कोल्हापूर: ‘गोकुळ’ दूध संघाने आपल्या दूध उत्पादकांना मोठा आधार देणारा निर्णय जाहीर केला आहे. संघाच्या संचालक मंडळाच्या मुंबईतील बैठकीत परराज्यातून म्हैस खरेदी करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात 10,000 रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे हे अनुदान आता एकूण 50,000 रुपये झाले आहे. दूध उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्थैर्य … Read more

राजू शेट्टी-राजेश क्षीरसागर वाद चिघळला: ५०० एकर जमिनीच्या आरोपावरून राजकीय रणकंदन

जयसिंगपूर: कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात सध्या एका नव्या वादाने जोर धरला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर ५०० एकर जमीन असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर, राजू शेट्टी यांनी तो आरोप फेटाळत, २६ जुलै रोजी बिंदू चौकात स्वतः हजर राहून ती जमीन क्षीरसागर यांच्या नावावर करण्याचे जाहीर … Read more

बेरोजगार सेवा सहकारी संस्थांसाठी सुवर्णसंधी! कंत्राटी कामांसाठी ३१ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करा

कोल्हापूर, दि. २४ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे करवीर तालुक्यामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या १८ तालुकास्तरीय रोजगार मेळाव्यांसाठी अंदाजित ९,००,०००/- (अक्षरी रुपये नऊ लाख फक्त) आणि कार्यालयीन स्टेशनरीसाठी अंदाजित ५०,०००/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) असा एकूण ९,५०,०००/- (अक्षरी रुपये नऊ लाख पन्नास हजार फक्त) इतका अंदाजित खर्च अपेक्षित आहे. सदर कामे … Read more

बाचणी येथील रखडलेल्या पुलाच्या कामासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा इशारा

कागल (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आणि करवीर तालुक्यांना जोडणाऱ्या दुधगंगा नदीवरील बाचणी-वडशिवाले दरम्यानच्या नवीन पुलाचे काम गेली चार वर्षांपासून रखडले असून, हे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने केली आहे. हे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे आणि तालुकाप्रमुख अशोक … Read more

error: Content is protected !!