पावसाळ्यापूर्वी घ्या ऑगस्ट २०२५ पर्यंतचं धान्य: शासनाचं आवाहन

मुंबई, दि. २९: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत मोफत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी टाळण्यासाठी, केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की, ऑगस्ट २०२५ पर्यंतचं अन्नधान्य आता ३० जून २०२५ पर्यंतच रास्तभाव दुकानांमधून उपलब्ध होईल.

Advertisements

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे हे स्पष्ट केलं आहे की, पावसाळ्यात पूर किंवा इतर प्रतिकूल हवामानामुळे धान्याच्या वितरणात व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे, लाभार्थ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी हा आगाऊ वितरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisements

सर्व पात्र लाभार्थ्यांनी या सूचनेची नोंद घेऊन, ३० जून २०२५ पूर्वी आपलं ऑगस्ट २०२५ पर्यंतचं अन्नधान्य रास्तभाव दुकानातून उचलून घ्यावं.

Advertisements

AD1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!