मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
हा कार्यक्रम सपन्न झाल्यानंतर सरपिराजी तलावाच्या सांडव्याच्या पाण्यावर पूल व्हावा या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यानां मुरगूडवाशियातर्फै देण्यात आले.
मुरगुड शहराच्या पूर्व बाजूस सर पिराजीराव तलाव हा शंभर वर्ष पूर्ण झालेल्या तलाव आहे पावसाळ्यात मुरगूड शहरास पाण्याचा वेढा पडतो यावेळी या ठिकाणी असणाऱ्या तलाव पूर्ण भरला की सांडव्यावरून पाणी रस्त्यावर येते या ठिकाणी पूल झाल्यास शहराबाहेर जाण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था खुली होईल शहरामध्ये महापूर काळात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर हाच एक मार्ग सुरू झाल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळेल.

तसेच बरेच दिवस पाणी साचून राहते व शेवाळ निर्माण होते.या शेवाळावरुन अनेक दुचाकीस्वार घसरून पडले आहेत.
त्यांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या आहेत . मुरगूड मधील सामाजिक कार्यकर्त्यांकडून शेवाळ काढून टाकण्याचे काम दरवर्षी केले जात आहे हा रस्ता मुरगूड कापशी गडहिंग्लज तसेच बेनिक्रे मार्गे निपाणी या गावांना जोडणारा रहदारीचा व वाहतुकीचा आहे. ऊसाचे ट्रॅक्टर , ट्रक अशा अवजड वाहनांची वाहतूक सुद्धा या रस्त्यावरून सर्रास होत असते.
त्यामुळे सांडव्यावर पूलाची आवश्यकता अत्यंत गरजेची आहे . अशी मागणी शहरवासीय अनेक वर्ष करत आहेत . यासाठी शासनाने याकडे लक्ष घालून या मागणीचे गांभिर्याने लक्ष घालावे व ही मागणी पूर्णत्वाकडे न्यावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना शहरवासीयंतर्फे निवेदन देण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, ओंकार पोतदार ,तानाजी भराडे,आनंदा रामाने, शिवाजीराव चौगले, धनंजय सूर्यवंशी, प्रफुल कांबळे,अमर सुतार, जगदीश गुरव,संकेत शहा, संकेत भोसले , यांच्यासह शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.