कागल : स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत कागल शहरात लवकरच भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. शहर स्वच्छता आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या महोत्सवात चित्रकला शिक्षक, ललित चित्रकला, आर्ट डिप्लोमा/एटीडी धारक, भिंतीचित्र स्पर्धेत विजेते, कला/चित्रकला दुकानदार (पुरावा आवश्यक) आणि रेखाचित्र मास्टर (ATD) सहभागी होऊ शकतात.

स्पर्धेचे विषय वैविध्यपूर्ण असून खालीलप्रमाणे आहेत: स्वच्छ कागल, स्वच्छ हवा, सौर ऊर्जेचा वापर, स्वच्छ भारत, स्वच्छ पाणी, पर्यावरण संवर्धन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्लास्टिक बंदी, माझी वसुंधरा, सामाजिक संदेश, बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचा वापर, कागलचे ऐतिहासिक वैभव, 3R (Reduce, Reuse, Recycle), रस्ता सुरक्षा, पर्यावरणपूरक सण, थंड छत जनजागृती, हॉर्न बंदी, फटाके बंदी, ई-कचरा जनजागृती आणि बांबू लागवड.
पारितोषिके – प्रथम क्रमांक – १ लाख, द्वितीय क्रमांक – ७५ हजार, तृतीय क्रमांक – ५० हजार आणि उत्तेजनार्थ पारितोषिक – १० हजार.
हा महोत्सव ११ फेब्रुवारी २०२५ ते १३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार आहे. स्पर्धेत आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेच्या अटी व शर्ती आरोग्य विभागात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी ९२२६९२९५९५ किंवा ९०९६४१३०१३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.