सर्व जाती धर्माच्या शोषितानी रस्त्यावर उतरल्याशिवाय सामाजिक, आर्थिक समता प्रस्थापित होणे शक्य नाही – प्रा. डॉ. अच्यूत माने

मुरगूड (शशी दरेकर) : शोषणाला जात असते का असा सवाल उपस्थित करत सर्व जाती धर्माच्या शोषितांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित होणे शक्य नाही असा इशारा जेष्ठ विचारवंत सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ.अच्चूत माने यांनी दिला.

Advertisements

समाजवादी प्रबोधिनी मुरगूड शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत  प्रमुख वक्ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके होते.

Advertisements

पॅंथरच्या चळवळीत हजारो तरुण पोर रस्त्यावर उतरली त्यांची नैतिक दहशत राज्यकर्त्यांवर वाचक ठेवणारी होती. जागतिकीकरणाच्या पाठोपाठ पैसा यायला लागल्यामुळे भोगवृत्ती वाढली त्यामुळे अत्याचार वाढले. विद्येला श्रमाची जोड द्या. विद्या आहे त्याला श्रम नको आहे श्रम करणारा दारिद्र्यात आहे ही विषमता सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे.
बहुजन समाजातील श्रमिकांची एकजूट करणे आवश्यक आहे अन्यथा भांडवली जग आपल्याला जगू देणार नाही असा इशारा माने यांनी दिला.

Advertisements

अनैतिक राज्यकर्त्यांना राजकारण्यांना भर चौकात शिक्षा दिली पाहिजे इतका प्रचंड संताप जनतेच्या मनात आहे. डॉ. आंबेडकर यांचे संपूर्ण आयुष्य हे नैतिकतेवर तारलेलं होतं.

समाजात दिसणारे लहान प्रश्न हाती घ्या आणि प्रबोधनाला प्रबोधनाला कृतीशी जोडू द्या त्या प्रश्नांची तोड शोधा. लोकशाहीचा डोलारा कोसळायचा नसेल तर सामाजिक आर्थिक क्षमता आणलीच पाहिजे. जाती धर्म पंथ यांच्या अस्मिता टोकदार झालेल्या असताना एक जात दुसऱ्या जातीचा दुसरा आर्थिक, सामाजिक, समतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रबोधित कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय आता पर्याय शिल्लक राहिला नाही.”

मार्क्सवादी पक्षाच्या राज्य कार्यकारणीत निवड झाल्याबद्दल सिद्धनेर्ली येथील कॉ. शिवाजी मगदूम यांचा सत्कार प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आला. स्वागत जयवंत हावळ प्रास्ताविक दलित मित्र डी.डी. चौगले, निवेदन समीर कटके तर आभार बबन बारदेस्कर यांनी मानले.

दलित मित्र डी.डी. चौगले, एस. आर. बाईत, एम.टी.सामंत
रणजीत कदम, बाबुराव शिरसेकर, भिकाजी कांबळे, पी. व्ही. पाटील, विश्वनाथ खैरे, महादेव भारमल, विनायक हावळ, प्रदीप वर्णे, महाराष्ट्र एकीकरण समितीचे तालुकाध्यक्ष जयराम मिरजकर, शिवाजीराव सातवेकर, दत्तात्रय कांबळे, नारायण करडे, सिकंदर जमादार, एकनाथ देशमुख, चंद्रकांत जाधव, महादेव खराडे आदी उपस्थित होते.

1 thought on “सर्व जाती धर्माच्या शोषितानी रस्त्यावर उतरल्याशिवाय सामाजिक, आर्थिक समता प्रस्थापित होणे शक्य नाही – प्रा. डॉ. अच्यूत माने”

  1. Terrific work! That is the type of info that are meant to be shared across the internet. Disgrace on Google for no longer positioning this put up higher! Come on over and talk over with my site . Thank you =)

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!